शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

Video - केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:58 IST

केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि  United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देकेरळच्या कोल्लममध्ये LDF आणि UDF च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाली. दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. मात्र नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

कोल्लम - केरळच्या कोल्लममध्ये Left Democratic Front (LDF) आणि  United Democratic Front (UDF) च्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे  मंगळवारी (23 एप्रिल) पार पडणार आहे. या टप्प्यासाठी रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सारेच पक्ष शक्ती प्रदर्शन करत होते. केरळमध्ये देखील प्रचार सुरू होता. कोल्लम जिल्ह्यातील पुयाप्पल्ली येथे Left Democratic Front (LDF) आणि  United Democratic Front (UDF) या पक्षाचे कार्यकर्ते रोड शो दरम्यान एकमेकांसमोर आले.

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. मात्र थोड्या वेळाने या वादाचे रुपांतर हे हाणामारीत झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड-शो दरम्यान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील झेंड्याच्या काठीनेच एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. 

आंध्र प्रदेशामध्ये याआधी काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना समोर आली होती. अनंतपूरमधील ताडीपत्रीमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देशम पक्ष (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांचा मृत्यू झाला होता. तसेच, आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्यासह 10 जण जखमी झाले होते. याशिवाय, राज्यात अनेक ठिकाणी तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019