शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:11 IST

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. देशातील २० टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील 'गरिबी हटाव'चा नारा दिला होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

इंदिरा गांधी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमात पुढील बाबींचा समावेश होता.

१. ग्रामीण भागातील गरीबी हटविणे

२. कृषी क्षेत्रासाठी वार्षिक रणनिती

३. सिंचन व्यवस्थेसाठी परिणामकारक योजना

४. उत्पादनात वाढ

५. जमीन सुधारणा प्रवर्तन

६. ग्रामीण मजुरांसाठी खास कार्यक्रम

७. स्वच्छ पिण्याचे पाणी

८. सर्वांसाठी आरोग्य

९. लोकसंख्या नियंत्रण

१०. शिक्षणाचा विस्तार

११. अनुसुचित जाती/ जमातींना न्याय

१२. महिलांसाठी समानता

१३. महिलांसाठी नवीन संधी

१४. सर्वांसाठी घर

१५. झोपडपट्टी सुधार

१६. व्यावसायासाठी रणनिती

१७. पर्यावरण संरक्षण

१८. ग्राहक समस्या सोडविणे

१९. प्रत्येक गावांत वीज

२०. जबाबदार प्रशासन

काय आहे, राहुल गांधी यांची योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास २५कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच जीवनमान सुधारण्यास मदत झाली होती. तसेच या कार्यक्रमामुळे काँग्रेसला फायदाच झाला होता. आता राहुल यांनी केलेल्या घोषणेचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीRahul Gandhiराहुल गांधी