शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:11 IST

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. देशातील २० टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील 'गरिबी हटाव'चा नारा दिला होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

इंदिरा गांधी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमात पुढील बाबींचा समावेश होता.

१. ग्रामीण भागातील गरीबी हटविणे

२. कृषी क्षेत्रासाठी वार्षिक रणनिती

३. सिंचन व्यवस्थेसाठी परिणामकारक योजना

४. उत्पादनात वाढ

५. जमीन सुधारणा प्रवर्तन

६. ग्रामीण मजुरांसाठी खास कार्यक्रम

७. स्वच्छ पिण्याचे पाणी

८. सर्वांसाठी आरोग्य

९. लोकसंख्या नियंत्रण

१०. शिक्षणाचा विस्तार

११. अनुसुचित जाती/ जमातींना न्याय

१२. महिलांसाठी समानता

१३. महिलांसाठी नवीन संधी

१४. सर्वांसाठी घर

१५. झोपडपट्टी सुधार

१६. व्यावसायासाठी रणनिती

१७. पर्यावरण संरक्षण

१८. ग्राहक समस्या सोडविणे

१९. प्रत्येक गावांत वीज

२०. जबाबदार प्रशासन

काय आहे, राहुल गांधी यांची योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास २५कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच जीवनमान सुधारण्यास मदत झाली होती. तसेच या कार्यक्रमामुळे काँग्रेसला फायदाच झाला होता. आता राहुल यांनी केलेल्या घोषणेचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीRahul Gandhiराहुल गांधी