शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:11 IST

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. देशातील २० टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील 'गरिबी हटाव'चा नारा दिला होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

इंदिरा गांधी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमात पुढील बाबींचा समावेश होता.

१. ग्रामीण भागातील गरीबी हटविणे

२. कृषी क्षेत्रासाठी वार्षिक रणनिती

३. सिंचन व्यवस्थेसाठी परिणामकारक योजना

४. उत्पादनात वाढ

५. जमीन सुधारणा प्रवर्तन

६. ग्रामीण मजुरांसाठी खास कार्यक्रम

७. स्वच्छ पिण्याचे पाणी

८. सर्वांसाठी आरोग्य

९. लोकसंख्या नियंत्रण

१०. शिक्षणाचा विस्तार

११. अनुसुचित जाती/ जमातींना न्याय

१२. महिलांसाठी समानता

१३. महिलांसाठी नवीन संधी

१४. सर्वांसाठी घर

१५. झोपडपट्टी सुधार

१६. व्यावसायासाठी रणनिती

१७. पर्यावरण संरक्षण

१८. ग्राहक समस्या सोडविणे

१९. प्रत्येक गावांत वीज

२०. जबाबदार प्रशासन

काय आहे, राहुल गांधी यांची योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास २५कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच जीवनमान सुधारण्यास मदत झाली होती. तसेच या कार्यक्रमामुळे काँग्रेसला फायदाच झाला होता. आता राहुल यांनी केलेल्या घोषणेचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीRahul Gandhiराहुल गांधी