शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

वडील-मुलीच्या नात्यात आचारसंहितेचा अडसर; कन्यादानाला मुकणार 100 कैदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 11:38 IST

निवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. जवळपास 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही. 

ठळक मुद्देनिवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही. आयोगाने राज्यातील सर्व कैद्यांना पॅरोल देण्यास मनाई केली आहे.

भोपाळ - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मात्र निवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. जवळपास 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही. 

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे लग्न सराईची धामधूम आहे. निवडणुक आयोगाकडे निवडणुकीच्या काळातील प्रशासनासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार असतात. मात्र अशाच एका निर्णयाचा फटका हा तुरुंगातील कैद्यांना बसला आहे. कारण आयोगाने राज्यातील सर्व कैद्यांना पॅरोल देण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे 100 कैद्यांना मुलांच्या लग्नासाठी जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलींचे कन्यादानही करता येणार नाही. 

भोपाळ सेंट्रल जेलमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांना मुलांच्या लग्नासाठी जायचे आहे. यातीलच एक कैदी सलीम हे सध्या एका हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. सलीम यांच्या मुलीचा विवाह 26 एप्रिल रोजी शाजापूर येथे होणार आहे. पण आयोगाच्या निर्णयामुळे त्याला आता सुट्टी मिळणार नाही. सलीम यांच्या प्रमाणेच आणखी काही कैदी आहेत ज्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता ते शक्य नाही.

तुरुंगातील सर्व कैद्यांना आधी तुरुंग प्रशासनाने पॅरोल मंजूर केला होता. पण आता आयोगाच्या आदेशामुळे तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या कैद्यांच्या मुलींचे लग्न आहे त्यांना कन्यादान कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 130 तुरुंग आहेत. या सर्व तुरुंगात मिळून 18 हजार कैदी आहेत. त्यापैकी 4 हजार जणांना प्रत्येक वर्षी पॅरोल दिला जातो. राज्यात असे एकूण 100 कैदी आहेत ज्यांना मुलाच्या अथवा मुलीच्या लग्नासाठी जायचे आहे. भोपाळ सेंट्रल जेलचे अधिक्षकांनी यांसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ज्या कैद्यांनी पॅरोलसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज आयोगाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आले आहेत. आयोगाने जर परवानगी दिली तर त्यांना सुट्टी दिली जाईल. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPrisonतुरुंगjailतुरुंग