शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:50 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. याला तीन नेते अपवाद आहेत.

ठळक मुद्दे२७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत.

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचं मतदान उद्या १२ मे रोजी होतंय. त्यानंतर, १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यांत ५९ जागांवर मतदान होईल आणि मग सगळ्यांच्या नजरा खिळतील, त्या २३ मे या तारखेवर. लोकसभेचा महासंग्राम कुणी जिंकला, हे या दिवशी ठरणार आहे. २७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज काही जण वर्तवताहेत. तो जर खरा ठरला आणि लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. हे त्रिकूट 'किंगमेकर' का ठरू शकतं, हे आकडे पाहून सहज लक्षात येईल. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. एनडीए किंवा यूपीएसोबत नसलेले पक्षही काय वेळप्रसंगी आपलं कौल कुणाला देतील, हे स्पष्ट दिसतंय. याला तीन नेते अपवाद आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे नेते केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी या तिघांनीही आपले पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे लोकसभेचे निकाल त्रिशंकू लागल्यास या त्रिकुटाला 'अच्छे दिन' येतील.

ओडिशा (२१), आंध्र प्रदेश (२५) आणि तेलंगणा (१७) या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ आणि टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच, ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. यावेळी त्यांची ताकद वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. म्हणजेच, ते यावेळीही 'चाळिशी' सहज पार करू शकतात आणि त्या जोरावर भाजपा किंवा काँग्रेसला ४४० व्होल्टचा झटका देऊ शकतात. 

जगनमोहन रेड्डी पाठिंब्यासाठी 'रेडी', पण...

आंध्र प्रदेशच्या सर्व २५ जागांवर ११ एप्रिलला मतदान झालं आहे. इथे चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांमध्ये थेट लढत आहे. कुणाशीही आघाडी न करता, हे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरलेत. चंद्राबाबूंनी मोदी सरकारविरोधात धडक मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळालं. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांची काँग्रेससोबतची जवळीक वाढली. एका म्यानात या दोन तलवारी राहणं थोडं कठीण असल्यानं जगनमोहन रेड्डी एनडीएच्या गोटात येऊ शकतात. अर्थात, जो आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी आधीच जाहीर केली आहे.    

पटनायक 'नवीन' भूमिका घेतील?

बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. याउलट, भाजपासोबत युती करून ते निवडणूक लढलेत आणि सरकारमध्येही एकत्र राहिलेत. २००९ नंतर यंदा प्रथमच बीजेडीनं स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यांची लढाई भाजपा आणि काँग्रेसशी आहे. प्रचारात या तीनही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केलीय. बीजेडी आत्तापर्यंत काँग्रेसपासून जितकी दूर होती, तितकीच ती भाजपापासूनही राहिली. पटनायक निकालांनंतर याच भूमिकेवर कायम राहतात की 'नवीन' भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

केसीआर... आर या पार?

अलीकडेच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसनं मुसंडी मारली होती. हे चित्र पाहता, तेलंगणामधील लोकसभेच्या १७ जागा भाजपा आणि काँग्रेससाठी 'खतरा' ठरू शकतात, असं स्पष्ट दिसतंय. सध्या तरी केसीआर यांना केंद्रात भाजपाचंही सरकार नकोय आणि काँग्रेसचंही. त्यादृष्टीनं त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केलीय. परंतु, तिसऱ्या आघाडीची घडी बसण्याची शक्यता कमीच असल्यानं केसीआर आर की पार हे निकालांनंतरच कळेल. 

दरम्यान, भाजपाच्या जागा कमी होतील, पण एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असाही एक अंदाज आहे. तसं झाल्यास हे पक्ष फारसे प्रकाशझोतात येतील, असं वाटत नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOdisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक 2019Telangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019