शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:50 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. याला तीन नेते अपवाद आहेत.

ठळक मुद्दे२७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत.

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचं मतदान उद्या १२ मे रोजी होतंय. त्यानंतर, १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यांत ५९ जागांवर मतदान होईल आणि मग सगळ्यांच्या नजरा खिळतील, त्या २३ मे या तारखेवर. लोकसभेचा महासंग्राम कुणी जिंकला, हे या दिवशी ठरणार आहे. २७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज काही जण वर्तवताहेत. तो जर खरा ठरला आणि लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. हे त्रिकूट 'किंगमेकर' का ठरू शकतं, हे आकडे पाहून सहज लक्षात येईल. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. एनडीए किंवा यूपीएसोबत नसलेले पक्षही काय वेळप्रसंगी आपलं कौल कुणाला देतील, हे स्पष्ट दिसतंय. याला तीन नेते अपवाद आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे नेते केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी या तिघांनीही आपले पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे लोकसभेचे निकाल त्रिशंकू लागल्यास या त्रिकुटाला 'अच्छे दिन' येतील.

ओडिशा (२१), आंध्र प्रदेश (२५) आणि तेलंगणा (१७) या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ आणि टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच, ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. यावेळी त्यांची ताकद वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. म्हणजेच, ते यावेळीही 'चाळिशी' सहज पार करू शकतात आणि त्या जोरावर भाजपा किंवा काँग्रेसला ४४० व्होल्टचा झटका देऊ शकतात. 

जगनमोहन रेड्डी पाठिंब्यासाठी 'रेडी', पण...

आंध्र प्रदेशच्या सर्व २५ जागांवर ११ एप्रिलला मतदान झालं आहे. इथे चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांमध्ये थेट लढत आहे. कुणाशीही आघाडी न करता, हे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरलेत. चंद्राबाबूंनी मोदी सरकारविरोधात धडक मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळालं. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांची काँग्रेससोबतची जवळीक वाढली. एका म्यानात या दोन तलवारी राहणं थोडं कठीण असल्यानं जगनमोहन रेड्डी एनडीएच्या गोटात येऊ शकतात. अर्थात, जो आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी आधीच जाहीर केली आहे.    

पटनायक 'नवीन' भूमिका घेतील?

बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. याउलट, भाजपासोबत युती करून ते निवडणूक लढलेत आणि सरकारमध्येही एकत्र राहिलेत. २००९ नंतर यंदा प्रथमच बीजेडीनं स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यांची लढाई भाजपा आणि काँग्रेसशी आहे. प्रचारात या तीनही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केलीय. बीजेडी आत्तापर्यंत काँग्रेसपासून जितकी दूर होती, तितकीच ती भाजपापासूनही राहिली. पटनायक निकालांनंतर याच भूमिकेवर कायम राहतात की 'नवीन' भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

केसीआर... आर या पार?

अलीकडेच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसनं मुसंडी मारली होती. हे चित्र पाहता, तेलंगणामधील लोकसभेच्या १७ जागा भाजपा आणि काँग्रेससाठी 'खतरा' ठरू शकतात, असं स्पष्ट दिसतंय. सध्या तरी केसीआर यांना केंद्रात भाजपाचंही सरकार नकोय आणि काँग्रेसचंही. त्यादृष्टीनं त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केलीय. परंतु, तिसऱ्या आघाडीची घडी बसण्याची शक्यता कमीच असल्यानं केसीआर आर की पार हे निकालांनंतरच कळेल. 

दरम्यान, भाजपाच्या जागा कमी होतील, पण एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असाही एक अंदाज आहे. तसं झाल्यास हे पक्ष फारसे प्रकाशझोतात येतील, असं वाटत नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOdisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक 2019Telangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019