शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha 2019 Exit Poll: या 10 कारणांमुळे मोदींच्या नावाला लोकांनी दिली पुन्हा पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 11:36 IST

5 वर्षाची सत्ता दिल्यानंतर जनतेने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच का पसंती दिली असेल त्याची अनेक कारणे आहेत. 

नवी दिल्ली - देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. एक्झिट पोलनुसार देशात कोणाची सत्ता येईल याचे अंदाजही वर्तविले गेले. यातून एनडीए पुन्हा सत्तेत येणार अशी शक्यता दिसून येते. सरासरी 300 आकडा एनडीए पार करेल असं बोललं जातं. 5 वर्षाची सत्ता दिल्यानंतर जनतेने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच का पसंती दिली असेल त्याची अनेक कारणे आहेत. 

  • देशभक्ती 

भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देशभक्तीचा मुद्दा प्रचारात आणला. विरोधी पक्ष देशभक्तीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत होते. मात्र भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला. पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणांमध्ये राष्ट्रवाद हवा की परिवादवाद हा मुद्दा असायचा. 

  • राष्ट्रीय सुरक्षा 

देशाला दहशतवाद्यांपासून धोका आहे. या दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊलं उचलली. त्यामुळे देश सुरक्षित राहिला. आज दहशतवादी भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करु शकत नाही हे प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदी यांनी लोकांना सांगितले. दहशतवादासोबत नक्षलवाद्यांनाही चाप बसविण्यात सरकार यशस्वी ठरलं. नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा केली गेली. राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक भाषणात वापरला गेला. 

  • दहशतवाद 

दहशतवादाचं नाव काढलं तर पाकिस्तान समोर दिसतो. जर पाकिस्तानला चर्चा हवी असेल तर दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा अशी भूमिका देशातील सरकारने घेतली. दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची पोल जगासमोर उघडी केली. पाकिस्तानातील दहशतवाद फक्त भारतासाठी नव्हे तर दक्षिण आशियाई देशांसाठी धोका आहे. दहशतवाद हा मुद्दा भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिल्याचं नरेंद्र मोदींना भाषणात सांगितले. 

  • हिंदूत्त्व 

हिंदूत्त्व हा मुद्दा भाजपाने प्रखरतेने भाषणात वापरला नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला. हिंदू दहशतवाद या शब्दावरुन विरोधकांना लक्ष्य करण्यात भाजपा यशस्वी झाली. 

  • स्वच्छता अभियान 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात स्वच्छता अभियानाचा मुद्दादेखील वापरला गेला. शौचालय, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केल्या. स्वच्छता अभियान हा देशातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. घाणीचं साम्राज्य पसरलेल्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयात स्वच्छता अभियान याचा मोठा वाटा असेल.

एक्झिट पोल'चे अंदाज खरे ठरले; तर 'मोदीलाट-२' उसळण्याची 'ही' असतील 5 प्रमुख कारणं!

  • आयुष्यमान भारत योजना 

भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना ही नवीन क्रांती असल्याचा प्रचार केला. आरोग्य क्षेत्रातील ही मोठी योजना आहे. देशातील अनेक गरिब लोकांना याचा लाभ होत आहे. आयुष्यमान भारत ही अशी योजना आहे ज्यामध्ये देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला. आरोग्याशी जोडलेली ही योजना लोकांशी जोडली गेली. 

  • उज्ज्वला योजना 

मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक उज्ज्वला योजना ही आहे. गरिब लोकांच्या घरात गॅस सिलेंडर देण्याची ही योजना आहे. चुलीवर जेवण बनवावं लागल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. जळणासाठी लाकडे आणावी लागतात. ज्यामध्ये वेळ जास्त जातो आणि मेहनतही जास्त लागते. जेवण बनविताना होत असलेल्या धुरांमुळे आरोग्यही धोक्यात येते. मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरली. मोदींनी या योजनेचा चांगला प्रचार केला. मन की बातमधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली. 

  • भ्रष्टाचार 

भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी भ्रष्टाचार सर्वात मोठा निवडणुकीच्या प्रचारात होता. मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला. त्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात राफेलव्यतिरिक्त एकही मुद्दा विरोधकांनी मोदींच्या विरोधात वापरला नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. 

  • विरोधकांची भ्रष्ट आघाडी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात विरोधकांच्या आघाडीला भ्रष्ट आघाडी एकत्र आल्याची टीका म्हणून संबोधण्यात आलं. जे घराणेशाहीला चालना देतात, जामीनावर बाहेर आहेत,  ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेत ते सर्व मिळून आघाडी केली आहे. एकीकडे विरोधकांची ही आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला. 

  • सुशासन 

नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. लोकांची अनेक कामे होऊ लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले.     

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी