शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:04 IST

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते

मुंबई -कोरोना लॉकडाऊन काळात सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे. अगदी गावच्या सरपंचापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच या प्लॅटफॉर्मचा वापर करुन संपर्क अभियान सुरु ठेवलं. घरातून बाहेर पडता येत नसल्याने, फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहितीचं आदान प्रदान आणि संवाद साधण्यात आला आहे. याच काळात, बांग्लादेशातील एका युवकाची पंजाबमधील तरुणीशी मैत्री झाली. त्यातून, तिच्या प्रेमासाठी तो चक्क २ हजार किमी पायपीट करुन पंजाबपर्यंत पोहोचला. 

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते. प्रेमात वेडा झालेला हा तरुण कोलकातामार्गे भारतीय सीमा ओलांडून आला, पण अटारी बॉर्डर येथे अडकला. येथून पाकिस्तानला जाण्याच्या प्रयत्नात असताना, बीएसएफच्या जवानांनी घुसखोर म्हणून त्याला अटक केली. या तरुणाचा नाव नयन उर्फ अब्दुल्लाह असून तो बांग्लादेशच्या शरीयतपूरचा रहिवाशी आहे. या तरुणाकडे सखोल चौकशी केल्यानंतर प्रेमाचं सत्य समोर आलं.  

लाहौरमधील रुबिनानामक युवतीसोबत नयनची फेसबुकद्वारे मैत्री झाली. त्यानंतर, दोघेही रात्रभर एकमेकांशी बोलत, त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हळू हळू गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. त्यामुळे रुबीनाने त्याला पाकिस्तानला बोलावून घेतले. मात्र, आपल्या घरापासून पाकिस्तान बराच दूर आहे, त्यामुळे भेट अशक्य वाटत होती. मात्र, पाकिस्तानमध्ये आल्यास आपण लग्न करू असं वचन रुबीनाने दिले होते. त्यामुळे, जोखीम पत्करत नयने बांग्लादेशची सीमा पार करत, भारतीय हद्दीत प्रवेश केला. कोलकाता येथून दिल्ली गाठली. दिल्लीतून अमृतसरपर्यंत पायीच प्रवास केला. रुबीनाच्या भेटीच्या ओढीत दिवस-रात्र चालत होता. कधी उपाशीपोटीच तो झोपतही होता. मात्र, लॉकडाऊन असल्याने लोकांनी वाटेत मदत केली. जेवणाचं साहित्यही भेटत गेलं. अमृतसर पोहोचल्यानंतर भेटीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 

अमृतसर येथून केवळ २७ किमी दूरवरील लाहौर येथे रुबीना होती. मात्र, अमृतसरच्या सीमारेषेवर सगळीकडे सैन्य तैनात केलेले होते. फेसिंगमुळे त्याला सीमारेषेवरुन जाताना अडचण निर्माण होत होती. त्याचदरम्यान, सीमारेषेवरील जवानांनी संशयास्पद असल्याने या युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर, येथील काहन गढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. पोलिसांना त्याच्याकडे कुठलिही संशयास्पद वस्तू नाही मिळाली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFacebookफेसबुकBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान