शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:04 IST

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते

मुंबई -कोरोना लॉकडाऊन काळात सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे. अगदी गावच्या सरपंचापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच या प्लॅटफॉर्मचा वापर करुन संपर्क अभियान सुरु ठेवलं. घरातून बाहेर पडता येत नसल्याने, फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहितीचं आदान प्रदान आणि संवाद साधण्यात आला आहे. याच काळात, बांग्लादेशातील एका युवकाची पंजाबमधील तरुणीशी मैत्री झाली. त्यातून, तिच्या प्रेमासाठी तो चक्क २ हजार किमी पायपीट करुन पंजाबपर्यंत पोहोचला. 

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते. प्रेमात वेडा झालेला हा तरुण कोलकातामार्गे भारतीय सीमा ओलांडून आला, पण अटारी बॉर्डर येथे अडकला. येथून पाकिस्तानला जाण्याच्या प्रयत्नात असताना, बीएसएफच्या जवानांनी घुसखोर म्हणून त्याला अटक केली. या तरुणाचा नाव नयन उर्फ अब्दुल्लाह असून तो बांग्लादेशच्या शरीयतपूरचा रहिवाशी आहे. या तरुणाकडे सखोल चौकशी केल्यानंतर प्रेमाचं सत्य समोर आलं.  

लाहौरमधील रुबिनानामक युवतीसोबत नयनची फेसबुकद्वारे मैत्री झाली. त्यानंतर, दोघेही रात्रभर एकमेकांशी बोलत, त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हळू हळू गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. त्यामुळे रुबीनाने त्याला पाकिस्तानला बोलावून घेतले. मात्र, आपल्या घरापासून पाकिस्तान बराच दूर आहे, त्यामुळे भेट अशक्य वाटत होती. मात्र, पाकिस्तानमध्ये आल्यास आपण लग्न करू असं वचन रुबीनाने दिले होते. त्यामुळे, जोखीम पत्करत नयने बांग्लादेशची सीमा पार करत, भारतीय हद्दीत प्रवेश केला. कोलकाता येथून दिल्ली गाठली. दिल्लीतून अमृतसरपर्यंत पायीच प्रवास केला. रुबीनाच्या भेटीच्या ओढीत दिवस-रात्र चालत होता. कधी उपाशीपोटीच तो झोपतही होता. मात्र, लॉकडाऊन असल्याने लोकांनी वाटेत मदत केली. जेवणाचं साहित्यही भेटत गेलं. अमृतसर पोहोचल्यानंतर भेटीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 

अमृतसर येथून केवळ २७ किमी दूरवरील लाहौर येथे रुबीना होती. मात्र, अमृतसरच्या सीमारेषेवर सगळीकडे सैन्य तैनात केलेले होते. फेसिंगमुळे त्याला सीमारेषेवरुन जाताना अडचण निर्माण होत होती. त्याचदरम्यान, सीमारेषेवरील जवानांनी संशयास्पद असल्याने या युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर, येथील काहन गढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. पोलिसांना त्याच्याकडे कुठलिही संशयास्पद वस्तू नाही मिळाली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFacebookफेसबुकBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान