शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

LockDown:अशी वेळ कोणावरच येऊ नये; वडिलांनी पोटच्या मुलाला बैलगाडीला जुंपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:56 IST

लॉकडाऊन संपण्यासाठी आणखी तीन दिवस बाकी आहे. मात्र सरकार चौथ्या लॉकडाऊनच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे गोरगरिबांचे हाल सुरुच आहेत. अनेक मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यात स्थलांतरित झाले होते.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात सरकारकडून लोकांची काळजी घेतली जात असली तरी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागला आहे. यात मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मजुरांसाठी गाड्या, ट्रेन यांची व्यवस्था केल्यानंतरही अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

लॉकडाऊन संपण्यासाठी आणखी तीन दिवस बाकी आहे. मात्र सरकार चौथ्या लॉकडाऊनच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे गोरगरिबांचे हाल सुरुच आहेत. अनेक मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यात स्थलांतरित झाले होते. मात्र कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी मजुरांनी शहर सोडत आपल्या गावी जाण्यासाठी वाट धरली. शेकडो मैलांची पायपीट करीत आपापल्या गावी निघाले आणि पोहोचले. मजुरांना कशाप्रकारे प्रवासादरम्यान संघर्ष करावा लागत आहे, याच्या बातम्या रोज आपल्या कानावर येतात. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 

पैसे संपले आणि पोटासाठी अन्न जवळ नाही. अशात घरीही पोहचायचे आहे. त्यामुळे एका मेंढपाळाला एक बैल अर्ध्या किंमतीत विकावा लागला. या मेंढपाळाने  बैल ५ हजारांत विकला. बैलाची किंमत १५ हजार होती. मात्र असहायतेचा फायदा घेत बैल विकत घेणाऱ्याने केवळ ५ हजार रुपये दिले. एक बैल विकल्याने दुसऱ्या बैलासोबत बैलगाडी ओढण्यासाठी मेंढपाळाने स्वतःच्याच १५ वर्षांच्या मुलाला बैलासारखे जुंपले. पोटात अन्न नाही, पायात नीट चप्पल नाही. रणरणत्या उन्हात हा लहानगा बैल गाडी ओढत होता. या  कुटुंबाला गेले काही तास घरी परतण्यासाठी असा संघर्ष करावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या