शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

CoronaVirus News: लॉकडाऊन अपयशी, मोदींनी पुढील रणनीती स्पष्ट करावी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:44 IST

कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशात ६० दिवसांच्या लॉकडाऊन नंतरही कोरोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. ही साथ वेगाने पसरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. आता सरकारने स्पष्ट करावे की, त्यांच्याकडे काय धोरण आहे? जेणेकरून, हा आजार, देशाची अर्थव्यवस्था आणि गरिबांच्या समस्यांवर तोडगा निघू शकेल. पंतप्रधान मोदी बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी समोर येऊन सांगायला हवे की, काय करायला हवे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सरकारला लक्ष्य केले.

मीडियाशी चर्चा करताना ते म्हणाले की, कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनसाठी २१ दिवस मागितले होते. आज ६० दिवस झाले आहेत. सरकारने स्पष्ट करावे की, लॉकडाऊनचे लक्ष्य साध्य झाले आहे काय? जाहीर आहे की, लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. मात्र, आता सरकारची काय रणनीती आहे? देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे? एमएसएमईची मदत कशी करणार? गरीब, वृद्ध आणि संसर्गाचा धोका असणाऱ्या दुसºया लोकांसाठी सरकार काय करणार आहे? याचा खुलासा करावा. एकीकडे कोरोनाची साथ वाढत आहे आणि आम्ही लॉकडाऊन हटवीत आहोत? हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारांशी अगोदर विचारविमर्श करायला हवा होता. मला असे वाटते की, जोपर्यंत लोकांना रोख रक्कम दिली जात नाही तोपर्यंत काहीही होणार नाही.

चीनच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने पारदर्शकता ठेवावी. जोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही तोपर्यंत टिप्पणी करणे योग्य नाही. उत्तर प्रदेश सरकारकडून श्रमिक आयोग बनवून लावण्यात आलेल्या अटींवर टीका करताना ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक अगोदर भारतीय आहे आणि त्याला कोठेही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर अंकुश लावला जाऊ शकत नाही.

संकटकाळातही काँग्रेसचे राजकारण -जावडेकर

राहुल गांधी यांच्या आरोपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खंडन केले व राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे संकटकाळातही राजकारण करण्याच्या काँग्रेसी कृतीचे उदाहरण आहे, असा प्रतिटोला लगावला. कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आधीच्या तीन दिवसांवरून आता १३ दिवसांपर्यंत लांबले हे ‘लॉकडाऊन’चेच यश आहे, असे जावडेकर म्हणाले. ते म्हणाले की, आधी काँग्रेसने ‘लॉकडाऊन’ लागू करण्यास आक्षेप घेतला होता. आता ते उठविले जाण्यास त्यांचा आक्षेप आहे. यावरून त्यांचा गोंधळच व्यक्त होतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या