शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

CoronaVirus News: लॉकडाऊन अपयशी, मोदींनी पुढील रणनीती स्पष्ट करावी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:44 IST

कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशात ६० दिवसांच्या लॉकडाऊन नंतरही कोरोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. ही साथ वेगाने पसरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. आता सरकारने स्पष्ट करावे की, त्यांच्याकडे काय धोरण आहे? जेणेकरून, हा आजार, देशाची अर्थव्यवस्था आणि गरिबांच्या समस्यांवर तोडगा निघू शकेल. पंतप्रधान मोदी बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी समोर येऊन सांगायला हवे की, काय करायला हवे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सरकारला लक्ष्य केले.

मीडियाशी चर्चा करताना ते म्हणाले की, कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनसाठी २१ दिवस मागितले होते. आज ६० दिवस झाले आहेत. सरकारने स्पष्ट करावे की, लॉकडाऊनचे लक्ष्य साध्य झाले आहे काय? जाहीर आहे की, लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. मात्र, आता सरकारची काय रणनीती आहे? देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे? एमएसएमईची मदत कशी करणार? गरीब, वृद्ध आणि संसर्गाचा धोका असणाऱ्या दुसºया लोकांसाठी सरकार काय करणार आहे? याचा खुलासा करावा. एकीकडे कोरोनाची साथ वाढत आहे आणि आम्ही लॉकडाऊन हटवीत आहोत? हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारांशी अगोदर विचारविमर्श करायला हवा होता. मला असे वाटते की, जोपर्यंत लोकांना रोख रक्कम दिली जात नाही तोपर्यंत काहीही होणार नाही.

चीनच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने पारदर्शकता ठेवावी. जोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही तोपर्यंत टिप्पणी करणे योग्य नाही. उत्तर प्रदेश सरकारकडून श्रमिक आयोग बनवून लावण्यात आलेल्या अटींवर टीका करताना ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक अगोदर भारतीय आहे आणि त्याला कोठेही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर अंकुश लावला जाऊ शकत नाही.

संकटकाळातही काँग्रेसचे राजकारण -जावडेकर

राहुल गांधी यांच्या आरोपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खंडन केले व राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे संकटकाळातही राजकारण करण्याच्या काँग्रेसी कृतीचे उदाहरण आहे, असा प्रतिटोला लगावला. कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आधीच्या तीन दिवसांवरून आता १३ दिवसांपर्यंत लांबले हे ‘लॉकडाऊन’चेच यश आहे, असे जावडेकर म्हणाले. ते म्हणाले की, आधी काँग्रेसने ‘लॉकडाऊन’ लागू करण्यास आक्षेप घेतला होता. आता ते उठविले जाण्यास त्यांचा आक्षेप आहे. यावरून त्यांचा गोंधळच व्यक्त होतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या