शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:14 IST

सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग काही दिवसांपासून सुरू झाला आहे, असा दावा प्रतिबंधक औषधे व संसर्गजन्य आजार या विषयातील तज्ज्ञांनी केला आहे. मात्र सामूहिक संसर्गाची सुरुवात झालेली नाही, या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे.

यासंदर्भात या तज्ज्ञांनी एका पत्रकात म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाने जोर धरला आहे. संसर्गजन्य आजार कसे फैलावतात याचे उत्तम ज्ञान असलेले अनेक तज्ज्ञ देशात उपलब्ध असून, त्यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केली होती का? तसे झाले असते तर या साथीचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करता आला असता. त्याऐवजी साथींच्या फैलावाचे अतिशय मर्यादित ज्ञान असलेल्या लोकांबरोबर चर्चा करून देशात लॉकडाऊन जाहीर करण्याचा भयंकर निर्णय केंद्र सरकारने घेतला.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आयपीएचए), इंडियन असोसिएशन आॅफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (आयएपीएसएम), इंडियन असोसिएशन आॅफएपिडेमिआॅलॉजिस्ट या तीन संस्थांनी हे संयुक्त पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे मानवी समस्या आणखी गुंतागुंतीच्या बनल्या. देशामधील कोरोना आजाराच्या फैलावाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती केंद्र सरकारने शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर व जनतेला दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी सरकारकडून पारदर्शक पद्धतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोरोनाच्या रुग्णांत कमी प्रमाणात लक्षणे दिसतात किंवा लक्षणेच आढळून येत नाहीत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घरातच थांबायला सांगून तिथे उपचार दिले पाहिजेत.स्थिती आणखी चिंताजनक बनू शकतेसंसर्गजन्य आजार व प्रतिबंधक औषधे या विषयातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना साथीचा प्रसार सुरू झाला त्या प्रारंभीच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली असती तर या साथीचा फैलाव खूपच कमी झाला असता. शहरांतून हे स्थलांतरित मजूर परतत असलेल्या ग्रामीण भागात आधीच पुरेशा आरोग्यसुविधा नाहीत. जर तिथे कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावला तर परिस्थिती आणखी चिंताजनक बनू शकते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस