शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:14 IST

सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग काही दिवसांपासून सुरू झाला आहे, असा दावा प्रतिबंधक औषधे व संसर्गजन्य आजार या विषयातील तज्ज्ञांनी केला आहे. मात्र सामूहिक संसर्गाची सुरुवात झालेली नाही, या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे.

यासंदर्भात या तज्ज्ञांनी एका पत्रकात म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाने जोर धरला आहे. संसर्गजन्य आजार कसे फैलावतात याचे उत्तम ज्ञान असलेले अनेक तज्ज्ञ देशात उपलब्ध असून, त्यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केली होती का? तसे झाले असते तर या साथीचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करता आला असता. त्याऐवजी साथींच्या फैलावाचे अतिशय मर्यादित ज्ञान असलेल्या लोकांबरोबर चर्चा करून देशात लॉकडाऊन जाहीर करण्याचा भयंकर निर्णय केंद्र सरकारने घेतला.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आयपीएचए), इंडियन असोसिएशन आॅफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (आयएपीएसएम), इंडियन असोसिएशन आॅफएपिडेमिआॅलॉजिस्ट या तीन संस्थांनी हे संयुक्त पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे मानवी समस्या आणखी गुंतागुंतीच्या बनल्या. देशामधील कोरोना आजाराच्या फैलावाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती केंद्र सरकारने शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर व जनतेला दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी सरकारकडून पारदर्शक पद्धतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोरोनाच्या रुग्णांत कमी प्रमाणात लक्षणे दिसतात किंवा लक्षणेच आढळून येत नाहीत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घरातच थांबायला सांगून तिथे उपचार दिले पाहिजेत.स्थिती आणखी चिंताजनक बनू शकतेसंसर्गजन्य आजार व प्रतिबंधक औषधे या विषयातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना साथीचा प्रसार सुरू झाला त्या प्रारंभीच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली असती तर या साथीचा फैलाव खूपच कमी झाला असता. शहरांतून हे स्थलांतरित मजूर परतत असलेल्या ग्रामीण भागात आधीच पुरेशा आरोग्यसुविधा नाहीत. जर तिथे कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावला तर परिस्थिती आणखी चिंताजनक बनू शकते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस