शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:38 IST

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल व चंदीगडमधील प्रशासनातील वरिष्ठांनी भाग घेतला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सोबतच एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या व्हिडिओ कॉन्फरन्सला विविध राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांची उपस्थिती होती. सरकारने लागू केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांनी सक्रिय सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा, असे आवाहन यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी सर्व राज्यांना केले.कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल व चंदीगडमधील प्रशासनातील वरिष्ठांनी भाग घेतला. या संकटाच्या काळात असंघटित क्षेत्रातील कामगार आणि निराधारांपर्यंत सरकारी उपाययोजना पोहचविण्याचे आवाहन यावेळी सर्व राज्यांना करण्यात आले. या व्हिडिओ कॉन्फरन्सला १४ राज्यांचे राज्यपाल उपस्थित होते.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. केरळातील १८०० निवृत्त डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी यांची मदत घेतली जात आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ३७५ मानसशास्त्रज्ञांचीही मदत घेतली जात आहे.तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलसाई सुंदरराजन यांनी सांगितले की, राजभवन परिसरात राहणाºया ८०० गरजू कुटुंबांना भोजन उपलब्ध करुन दिले जात आहे. एम. व्यंकय्या नायडू यांनी तेलंगणाच्या राज्यपालांना सूचना केली की, चित्रपट कलाकार, लेखक आणि बुद्धीजीवी लोकांची मदत घेतली जावी. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली.ज्येष्ठ, दिव्यांगांना आगाऊ पेन्शन- विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना तीन महिन्याची पेन्शन आगाऊ देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी) ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना ही पेन्शन दिली जाते. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.- ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होते. २.९८ लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. एनएसएपी अंतर्गत २०० प्रति महिना पेन्शन ६० ते ७९ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते. तर, ८० वर्षांवरील ज्येष्ठांना ५०० रुपये प्रति महिना दिले जातात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamnath Kovindरामनाथ कोविंद