शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर अंजू कुठे गेली?; अचानक दिल्लीतून झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:24 IST

अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली.

फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू आता भारतात परतली आहे. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर तिचा ठावठिकाणा माहीत नाही. ती राजस्थानच्या भिवडी येथील तिच्या घरी गेली नाही किंवा ती आपल्या मुलांनाही भेटली नाही. अंजूच्या मुलांनीही तिला राजस्थानमध्ये भेटण्यास नकार दिला आहे. अंजू भारतात आल्यानंतर तिच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व वाहने आणि अनोळखी व्यक्तींची कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या टीमने अंजूची 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचीही चौकशी केली. भिवडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) दीपक सैनी यांनी दिेलेल्या माहितीनुसार, अंजूच्या प्रकरणाचा तपास सुरू असून लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गरज पडल्यास अंजूची चौकशी केली जाऊ शकते आणि तिला अटकही केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. अंजू दिल्लीत आल्यावर तिला पाकिस्तानात राहण्याबाबत विचारण्यात आले, मात्र तिने याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र ती मुलांना घेऊन पाकिस्तानात जाणार असल्याचे तिने याआधी सांगितलं आहे.

जेव्हा अरविंदला अंजूच्या पाकिस्तानातून परतण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे कोणतीही माहिती नाही आणि मला त्यासंबंधी काहीही बोलण्यात रस नाही. अरविंदच्या म्हणण्यानुसार, त्यांचा आणि अंजूचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. घटस्फोट होण्यासाठी तीन ते पाच महिने लागतात. अंजूला भारतात येण्यासाठी केवळ 1 महिन्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, तिला घटस्फोटानंतरच मुलांचा ताबा मिळू शकतो.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत