शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर अंजू कुठे गेली?; अचानक दिल्लीतून झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:24 IST

अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली.

फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू आता भारतात परतली आहे. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर तिचा ठावठिकाणा माहीत नाही. ती राजस्थानच्या भिवडी येथील तिच्या घरी गेली नाही किंवा ती आपल्या मुलांनाही भेटली नाही. अंजूच्या मुलांनीही तिला राजस्थानमध्ये भेटण्यास नकार दिला आहे. अंजू भारतात आल्यानंतर तिच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व वाहने आणि अनोळखी व्यक्तींची कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या टीमने अंजूची 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचीही चौकशी केली. भिवडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) दीपक सैनी यांनी दिेलेल्या माहितीनुसार, अंजूच्या प्रकरणाचा तपास सुरू असून लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गरज पडल्यास अंजूची चौकशी केली जाऊ शकते आणि तिला अटकही केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. अंजू दिल्लीत आल्यावर तिला पाकिस्तानात राहण्याबाबत विचारण्यात आले, मात्र तिने याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र ती मुलांना घेऊन पाकिस्तानात जाणार असल्याचे तिने याआधी सांगितलं आहे.

जेव्हा अरविंदला अंजूच्या पाकिस्तानातून परतण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे कोणतीही माहिती नाही आणि मला त्यासंबंधी काहीही बोलण्यात रस नाही. अरविंदच्या म्हणण्यानुसार, त्यांचा आणि अंजूचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. घटस्फोट होण्यासाठी तीन ते पाच महिने लागतात. अंजूला भारतात येण्यासाठी केवळ 1 महिन्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, तिला घटस्फोटानंतरच मुलांचा ताबा मिळू शकतो.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत