शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर अंजू कुठे गेली?; अचानक दिल्लीतून झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:24 IST

अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली.

फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न करण्यासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू आता भारतात परतली आहे. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर तिचा ठावठिकाणा माहीत नाही. ती राजस्थानच्या भिवडी येथील तिच्या घरी गेली नाही किंवा ती आपल्या मुलांनाही भेटली नाही. अंजूच्या मुलांनीही तिला राजस्थानमध्ये भेटण्यास नकार दिला आहे. अंजू भारतात आल्यानंतर तिच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व वाहने आणि अनोळखी व्यक्तींची कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या टीमने अंजूची 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचीही चौकशी केली. भिवडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) दीपक सैनी यांनी दिेलेल्या माहितीनुसार, अंजूच्या प्रकरणाचा तपास सुरू असून लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गरज पडल्यास अंजूची चौकशी केली जाऊ शकते आणि तिला अटकही केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

अंजू वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतल्यानंतर पंजाब पोलिसांच्या गुप्तचर पथकाने आणि आयबीने अमृतसरमध्ये तिची चौकशी केली आणि त्यानंतर बुधवारी तिला दिल्लीला जाण्याची परवानगी दिली. अंजू दिल्लीत आल्यावर तिला पाकिस्तानात राहण्याबाबत विचारण्यात आले, मात्र तिने याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र ती मुलांना घेऊन पाकिस्तानात जाणार असल्याचे तिने याआधी सांगितलं आहे.

जेव्हा अरविंदला अंजूच्या पाकिस्तानातून परतण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे कोणतीही माहिती नाही आणि मला त्यासंबंधी काहीही बोलण्यात रस नाही. अरविंदच्या म्हणण्यानुसार, त्यांचा आणि अंजूचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. घटस्फोट होण्यासाठी तीन ते पाच महिने लागतात. अंजूला भारतात येण्यासाठी केवळ 1 महिन्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, तिला घटस्फोटानंतरच मुलांचा ताबा मिळू शकतो.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत