शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पदव्युत्तर मेडिकल प्रवेशांतील स्थानिक वास्तव्याची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:26 IST

राज्यातील सरकारी, महापालिकांच्या आणि खासगी अनुदानित वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये राज्य कोट्याच्या ५० टक्के जागांसाठी महाराष्ट्रातील वास्तव्याची अट लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केला.

- विशेष प्रतिनिधीनवी दिल्ली - राज्यातील सरकारी, महापालिकांच्या आणि खासगी अनुदानित वैद्यकीय व दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये राज्य कोट्याच्या ५० टक्के जागांसाठी महाराष्ट्रातील वास्तव्याची अट लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केला.या जागांवर प्रवेशासाठी महाराष्ट्राचे निवासी असलेले (डोमिसाइल) उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील, असा नियम प्रवेश प्राधिकरणाने २९ व ३० जानेवारीच्या अधिसूचनांद्वारे जाहीर केला होता. राज्यात पदव्युत्तर वैद्यकीय पदवीच्या १,६३९ तर पदविकेच्या २८९ जागा आहेत.राज्यातून एमबीबीएस झालेल्या परंतु इथे कायम वास्तव्य नसलेल्या डॉक्टरांनी याविरुद्ध हायकोर्टात याचिका केली होती. गेल्या २२ फेब्रुवारी रोजी न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करीत ‘डोमिसाइल’चा नियम रद्द केला होता. अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी म्हणाले होते की, पदव्युत्तर प्रवेशातील ५० टक्के जागा राष्ट्रीय व ५० टक्के जागा राज्य कोट्याच्या असतात. राष्ट्रीय कोट्यासाठी देशभरातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. ते येथे शिक्षण घेऊन परराज्यांत व्यवसाय करतात. त्यांच्या शिक्षणावर राज्य खर्च करते पण त्यांच्या सेवांचा राज्याला लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्य कोट्यातील प्रवेश राज्यात स्थायिकांनाच मिळावेत या हेतूने हा नियम केला आहे. परंतु हे म्हणणे अमान्य करीत खंडपीठाने म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप जैन (१९८४) व विशाल गोयल (२०१४) या प्रकरणांत दिलेले निकाल इतके स्पष्ट आहेत की, राज्याचे हे म्हणणे विचारातही घेतले जाऊ शकत नाही.गेल्या वर्षीही राज्याने असा नियम केला होता व डॉ. गंगादीप माही व इतरांच्या याचिकेवर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. एका वर्षी नियमाला स्थगिती व दुसऱ्या वर्षी तो रद्द केला गेला तरी राज्य सरकारने हट्ट न सोडता सुप्रीम कोर्टात अपील केले. न्या. अरुण मिश्रा व न्या. उदय उमेश लळित यांच्या खंडपीठाने एका ओळीचा आदेश देत ते फेटाळले. या खटल्यात राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तर मूळ याचिकाकर्त्यांसाठी ज्येष्ठ वकील श्याम दिवाण व अ‍ॅड. पूजा थोरात यांनी काम पाहिले.कर्नाटकचाही नियम रद्दशेजारच्या कर्नाटक राज्यानेही तेथील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमधील ५० टक्के राज्य कोट्यासाठी असाच नियम २०१४ मध्ये केला. कोर्टाकडून तो बेकायदा ठरवून रद्द केला गेला. त्या वर्षी पुन्हा तसाच नियम केला गेला. त्याविरुद्ध ४४ डॉक्टर-विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. न्या. मिस्रा व न्या. लळित यांच्याच खंडपीठाने कर्नाटकचा नियमही रद्द केला.

टॅग्स :Medicalवैद्यकीयdocterडॉक्टरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र