शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

“एकाच व्यक्तीमुळे NDA सोडले अन् आता पुन्हा सहभागी झालो”; चिराग पासवान स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 23:09 IST

NDA मध्ये सहभागी का झालो, कोणत्या व्यक्तीमुळे NDA सोडली होती, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

Chirag Paswan: २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विरोधकांच्या बंगळुरूतील बैठकीला उत्तर देण्यासाठी NDA नेही मित्र पक्षांची बैठक त्याच दिवशी आयोजित केली होती. यामध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वसंध्येला लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मात्र, एनडीए का सोडली होती आणि पुन्हा सहभागी होण्याचे कारण काय, यासाठी कोण जबाबदार होते, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

सन २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान काही मतभेदांमुळे चिराग पासवान यांनी युतीपासून फारकत घेतली. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एनडीएपासून फारकत घेऊन पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. २०२० मध्ये आम्ही एनडीएपासून फारकत घेतली. मात्र, तेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाशी कोणतीही अडचण नव्हती. गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. अनेकवेळा माझ्यावरही आरोप झाले की, तुम्ही अचानक भक्त झाले आहात. हनुमान म्हणत टोले लगावले जात होते. भाजपने तुमच्यासाठी काय केले नाही, असे सांगण्यात आले. माझी अडचण फक्त आणि फक्त माझे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही. तुम्हाला आयटी क्षेत्राबद्दल बोलावे लागेल, उद्योगांबद्दल बोलावे लागेल. वेगवेगळ्या शहरांना शैक्षणिक हब कसे बनवता येईल यावर बोलायचे आहे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. पूर आणि दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय सांगावे लागतील. मात्र यापैकी मुख्यमंत्री करायला तयार नव्हते. हे त्यांच्या व्हिजन अजेंड्यात कुठेही दिसत नाही. त्यानंतर आमचे एकमत झाले नाही आणि त्याचवेळी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे चिराग पासवान यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्या पक्षात किंवा माझ्या कुटुंबातील तुटण्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरले नाही. माझे कुटुंब तोडण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा हात आहे, हे माहिती असतानाही मी त्यांना जबाबदार धरले नाही, कारण माझीच माणसे माझ्यासोबत नाहीत तर मी दुसऱ्यांना कसे सांगणार, अशी खंतही चिराग पासवान यांनी बोलून दाखवली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहार