शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

“एकाच व्यक्तीमुळे NDA सोडले अन् आता पुन्हा सहभागी झालो”; चिराग पासवान स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 23:09 IST

NDA मध्ये सहभागी का झालो, कोणत्या व्यक्तीमुळे NDA सोडली होती, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

Chirag Paswan: २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विरोधकांच्या बंगळुरूतील बैठकीला उत्तर देण्यासाठी NDA नेही मित्र पक्षांची बैठक त्याच दिवशी आयोजित केली होती. यामध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वसंध्येला लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मात्र, एनडीए का सोडली होती आणि पुन्हा सहभागी होण्याचे कारण काय, यासाठी कोण जबाबदार होते, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

सन २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान काही मतभेदांमुळे चिराग पासवान यांनी युतीपासून फारकत घेतली. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एनडीएपासून फारकत घेऊन पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. २०२० मध्ये आम्ही एनडीएपासून फारकत घेतली. मात्र, तेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाशी कोणतीही अडचण नव्हती. गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. अनेकवेळा माझ्यावरही आरोप झाले की, तुम्ही अचानक भक्त झाले आहात. हनुमान म्हणत टोले लगावले जात होते. भाजपने तुमच्यासाठी काय केले नाही, असे सांगण्यात आले. माझी अडचण फक्त आणि फक्त माझे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही. तुम्हाला आयटी क्षेत्राबद्दल बोलावे लागेल, उद्योगांबद्दल बोलावे लागेल. वेगवेगळ्या शहरांना शैक्षणिक हब कसे बनवता येईल यावर बोलायचे आहे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. पूर आणि दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय सांगावे लागतील. मात्र यापैकी मुख्यमंत्री करायला तयार नव्हते. हे त्यांच्या व्हिजन अजेंड्यात कुठेही दिसत नाही. त्यानंतर आमचे एकमत झाले नाही आणि त्याचवेळी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे चिराग पासवान यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्या पक्षात किंवा माझ्या कुटुंबातील तुटण्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरले नाही. माझे कुटुंब तोडण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा हात आहे, हे माहिती असतानाही मी त्यांना जबाबदार धरले नाही, कारण माझीच माणसे माझ्यासोबत नाहीत तर मी दुसऱ्यांना कसे सांगणार, अशी खंतही चिराग पासवान यांनी बोलून दाखवली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहार