शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

“एकाच व्यक्तीमुळे NDA सोडले अन् आता पुन्हा सहभागी झालो”; चिराग पासवान स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 23:09 IST

NDA मध्ये सहभागी का झालो, कोणत्या व्यक्तीमुळे NDA सोडली होती, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

Chirag Paswan: २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विरोधकांच्या बंगळुरूतील बैठकीला उत्तर देण्यासाठी NDA नेही मित्र पक्षांची बैठक त्याच दिवशी आयोजित केली होती. यामध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वसंध्येला लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मात्र, एनडीए का सोडली होती आणि पुन्हा सहभागी होण्याचे कारण काय, यासाठी कोण जबाबदार होते, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

सन २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान काही मतभेदांमुळे चिराग पासवान यांनी युतीपासून फारकत घेतली. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एनडीएपासून फारकत घेऊन पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. २०२० मध्ये आम्ही एनडीएपासून फारकत घेतली. मात्र, तेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाशी कोणतीही अडचण नव्हती. गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. अनेकवेळा माझ्यावरही आरोप झाले की, तुम्ही अचानक भक्त झाले आहात. हनुमान म्हणत टोले लगावले जात होते. भाजपने तुमच्यासाठी काय केले नाही, असे सांगण्यात आले. माझी अडचण फक्त आणि फक्त माझे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही. तुम्हाला आयटी क्षेत्राबद्दल बोलावे लागेल, उद्योगांबद्दल बोलावे लागेल. वेगवेगळ्या शहरांना शैक्षणिक हब कसे बनवता येईल यावर बोलायचे आहे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. पूर आणि दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय सांगावे लागतील. मात्र यापैकी मुख्यमंत्री करायला तयार नव्हते. हे त्यांच्या व्हिजन अजेंड्यात कुठेही दिसत नाही. त्यानंतर आमचे एकमत झाले नाही आणि त्याचवेळी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे चिराग पासवान यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्या पक्षात किंवा माझ्या कुटुंबातील तुटण्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरले नाही. माझे कुटुंब तोडण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा हात आहे, हे माहिती असतानाही मी त्यांना जबाबदार धरले नाही, कारण माझीच माणसे माझ्यासोबत नाहीत तर मी दुसऱ्यांना कसे सांगणार, अशी खंतही चिराग पासवान यांनी बोलून दाखवली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहार