शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

“एकाच व्यक्तीमुळे NDA सोडले अन् आता पुन्हा सहभागी झालो”; चिराग पासवान स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 23:09 IST

NDA मध्ये सहभागी का झालो, कोणत्या व्यक्तीमुळे NDA सोडली होती, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

Chirag Paswan: २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विरोधकांच्या बंगळुरूतील बैठकीला उत्तर देण्यासाठी NDA नेही मित्र पक्षांची बैठक त्याच दिवशी आयोजित केली होती. यामध्ये ३८ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वसंध्येला लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मात्र, एनडीए का सोडली होती आणि पुन्हा सहभागी होण्याचे कारण काय, यासाठी कोण जबाबदार होते, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

सन २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान काही मतभेदांमुळे चिराग पासवान यांनी युतीपासून फारकत घेतली. आता ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एनडीएपासून फारकत घेऊन पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. २०२० मध्ये आम्ही एनडीएपासून फारकत घेतली. मात्र, तेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाशी कोणतीही अडचण नव्हती. गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. अनेकवेळा माझ्यावरही आरोप झाले की, तुम्ही अचानक भक्त झाले आहात. हनुमान म्हणत टोले लगावले जात होते. भाजपने तुमच्यासाठी काय केले नाही, असे सांगण्यात आले. माझी अडचण फक्त आणि फक्त माझे मुख्यमंत्री नितीश कुमार आहे हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही

मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर माझा विश्वास नाही. तुम्हाला आयटी क्षेत्राबद्दल बोलावे लागेल, उद्योगांबद्दल बोलावे लागेल. वेगवेगळ्या शहरांना शैक्षणिक हब कसे बनवता येईल यावर बोलायचे आहे. शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. पूर आणि दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय सांगावे लागतील. मात्र यापैकी मुख्यमंत्री करायला तयार नव्हते. हे त्यांच्या व्हिजन अजेंड्यात कुठेही दिसत नाही. त्यानंतर आमचे एकमत झाले नाही आणि त्याचवेळी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे चिराग पासवान यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्या पक्षात किंवा माझ्या कुटुंबातील तुटण्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरले नाही. माझे कुटुंब तोडण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा हात आहे, हे माहिती असतानाही मी त्यांना जबाबदार धरले नाही, कारण माझीच माणसे माझ्यासोबत नाहीत तर मी दुसऱ्यांना कसे सांगणार, अशी खंतही चिराग पासवान यांनी बोलून दाखवली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiharबिहार