शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; 35 मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:31 IST

जेवल्यानंतर 35 मुलं आजारी पडली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिहारच्या छपरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे, मध्यान्ह भोजन खाल्ल्याने पुन्हा एकदा अनेक मुलांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर टिकुलिया टोला डुमरी येथील विद्यालयात मध्यान्ह भोजनात पाल सापडली आहे. हे जेवल्यानंतर 35 मुलं आजारी पडली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीओ संजय कुमार यांनी रुग्णालयात आजारी मुलांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आणि सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. 

सर्व मुलांवर योग्य उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम तयार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. मध्यान्ह भोजनात निष्काळजीपणाच्या या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दरम्यान, शाळेतील विद्यार्थी आकाश कुमारने सांगितले की, आज सकाळी नेहमीप्रमाणे मुलं एमडीएमचे अन्न खात असताना आकाशच्या ताटात एक मेलेली पाल दिसली.

आकाशने याबाबत शिक्षकांना माहिती दिल्यानंतर गोंधळ उडाला. घाईगडबडीत मध्यान्ह भोजनाचे वाटप बंद करण्यात आले. काही वेळाने मुलांची प्रकृती ढासळू लागली आणि 50 मुलांना उलट्या होऊ लागल्या आणि ते आजारी पडले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पूनम कुमारी यांनी सांगितले की स्वयंसेवी संस्थेद्वारे अन्न वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड पाहायला मिळत आहे.

पूनम कुमारी यांनी सांगितले की, माहिती मिळताच अन्न वाटप थांबवण्यात आले असून सर्व आजारी मुलांना रुग्णवाहिकेतून सदर रुग्णालयात आणण्यात आले आहे. दुसरीकडे या घटनेनंतर सदर रुग्णालय अलर्टवर असून सिव्हिल सर्जन स्वत: रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. सदर रुग्णालयात 35 मुलांना दाखल केल्याची पुष्टी करताना सिव्हिल सर्जन म्हणाले की, मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. सर्व मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :Biharबिहार