शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पान खाऊन पिचकारी मारुन वंदे मातरम् म्हणणार का ? - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 17:23 IST

पूर्ण ताकतीने दिल्या जाणा-या वंदे मातरम्, वंदे मातरम् हे शब्द ऐकल्यानंतर अंगावर शहारे उभे राहिले. पण मी संपूर्ण हिंदुस्थानला एक प्रश्न विचारतो.

ठळक मुद्दे मी जे बोलतोय त्यामुळे अनेक लोकांना वेदना होतील याची मला पूर्ण कल्पना आहे.आपण सर्व कचरा भारत मातेवर टाकून नंतर वंदे मातरम म्हणणार का ?

नवी दिल्ली, दि. 11 - पूर्ण ताकतीने दिल्या जाणा-या वंदे मातरम्, वंदे मातरम् हे शब्द ऐकल्यानंतर अंगावर शहारे उभे राहिले. पण मी संपूर्ण हिंदुस्थानला एक प्रश्न विचारतो. आपल्याला वंदे मातरम बोलण्याचा अधिकार आहे का ? मी जे बोलतोय त्यामुळे अनेक लोकांना वेदना होतील याची मला पूर्ण कल्पना आहे. 50 वेळा विचार करा, आपल्या वंदे मातरम् म्हणण्याचा हक्क आहे का ? पान खाऊन पिचकारी मारायची आणि नंतर वंदे मातरम म्हणायचे का ? 

आपण सर्व कचरा भारत मातेवर टाकून नंतर वंदे मातरम म्हणणार का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने नवी दिल्लीत 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी  संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात 'स्वच्छ भारत' मिशनवर भर देताना स्वच्छतेचा विचार मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. 

जे कचरा उचलतात, साफ सफाई करतात त्यांना वंदे मातरम म्हणण्याचा पहिला हक्क आहे असे मोदी म्हणाले. आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना मोदींनी प्रगतीशील भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या भाषणात मोदींनी मांडलेले काही ठळक मुद्दे...

- स्वामी विवेकानंद यांच्या 'ब्रदर्स अँड सिस्टर्स' या दोन शब्दांतून भारताच्या ताकदीचा परिचय करुन दिला. - स्वामी विवेकानंदांवर कुणाचाही दबाव नव्हता. - स्वामी विवेकानंदांनी 1893 साली 9/11 या दिवशी शिकागोमध्ये केलेले भाषण विश्वविजयाचा दिवस होता. 

- आज 9/11 आहे जगामध्ये 2001 नंतर 9/11 बद्दल मोठया प्रमाणावर चर्चा सुरु झाली. पण आम्हाला 1893 सालचे  9/11 आठवते.

- भारतामातेला गलिच्छ करत, आपल्याला वंदे मातरम बोलण्याचा हक्क आहे का ?

- माझे हे बोलणे अनेकांना दुखावणारे आहे याची मला कल्पना आहे.- स्वच्छतेचे काम करणा-यांना पहिला वंदे मातरम बोलण्याचा हक्क आहे. 

- तुम्ही महिलांकडे आदराने पाहता का ? - पहिले शौचालय मग देवालय असं मी आधीही बोललो होतो आजही सांगतो.- 'वंदे मातरम् ऐकल्यावर रोमांच उभे राहतात' - रस्त्यावर कचरा टाकून वंदे मातरम म्हणणार का ?

- स्वामी विवेकानंदांमध्ये आत्मसन्मान, आत्मगौरवाचा भाव होता. - भारतातील शेतीला विज्ञानाच्या मदतीने आधुनिक करण्याचा विवेकानंद त्यावेळी विचार करायचे. 

- माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. - तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला पहिले प्राधान्य. - नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा तरुणवर्ग तयार झाला पाहिजे. 

- अपयशाशिवाय यश मिळत नाही. - यशाचा रस्ता अपयश बनवत, म्हणून अपयशाला घाबरु नका. - किना-यावर उभे राहून लाट बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा. 

- तरुणाईने नावीन्याचा शोध घेतला पाहिजे. - कच-यामधून नव निर्मितीचा विद्यार्थ्यांचा प्रकल्प मी पाहिला, हा स्वच्छ भारताचा परिणाम.  - भारतात प्रतिभेची कमतरता नाही. - विवेकानंदांची संकल्पना होती वन एशिया. - विश्व संकटात असताना त्याला मार्ग दाखवण्याची क्षमता वन एशियामध्ये आहे. 

- पंजाबच्या कॉलेजमध्ये केरल डे होईल का ? तरच एक भारत, श्रेष्ठ भारत शक्य होईल. - कल्पकतेशिवाय आयुष्य नाही, देशाची ताकत, गरज पूर्ण होईल असे काम करुया. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी