शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपला आधार कार्डशी लिंक करा', हायकोर्टात याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:18 IST

फेसबुक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आधारशी लिंक करण्यासंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

नवी दिल्ली - फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला आधार कार्डशी लिंक करण्यासंदर्भात देशातील उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, मद्रास न्यायालयात दोन आणि ओडिशा व मुंबई उच्च न्यायालयात प्रत्येकी एक-एक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने आपली बाजू मांडली आहे. आम्हाला कायद्याच्या अनेक बाजूंचा अभ्यास करावा लागतो. कारण, कोट्यवधी युजर्सं आपापल्या सोयीने या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, असे फेसबुक अन् व्हॉट्सअॅपने कोर्टात म्हटले आहे. 

फेसबुक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आधारशी लिंक करण्यासंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. फेसबुकतर्फे मुकूल रोहतगी यांनी केरळ उच्च न्यायालयाचा संदर्भ देत, एकाच देशात दोन कायदे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, सरकारचे प्रस्तावित संशोधन विधेयक आणि सरकारच्या दृष्टीकोनाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थिते केले आहेत. तसेच, व्हॉट्सअॅपतर्फे कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना सोशल मीडियासंदर्भातील या सर्वच याचिकांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व्हावी, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. 

सरकारतर्फे बाजू मांडताना, अटोर्नी जनरल केके. वेणुगोपाल यांनी म्हटले की, सरकारकडे अशी कुठलिही यंत्रणा नाही, ज्याद्वारे मेसेज करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा शोध लावला जाईल. विशेषत: गुन्हेगारीसंदर्भातील पोस्ट. आता, ब्लू व्हेलसारख्या गेम्संनाही कसे थांबवणार?, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले. दरम्यान, कुठल्या अटी आणि शर्तींवर माहिती शेअर केली जावी, हाही प्रश्न कोर्टासमोर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  

टॅग्स :FacebookफेसबुकCourtन्यायालयSocial Mediaसोशल मीडियाAdhar Cardआधार कार्ड