शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 08:02 IST

अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही ‘इंडिया’ भाजपला हरवणार

अहमदाबाद : अयाेध्येत भाजपचा पराभव करुन ‘इंडिया’ आघाडीने राम मंदिर आंदाेलनाचा पराभव केला. अयाेध्येत जसा पराभव केला तसाच गुजरातमध्येही पुढील निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते व लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बाेलत हाेते.

राहुल गांधी यांनी गुजरात दाैऱ्यात भाजपवर टीका केली. ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदाेलन सुरू केले हाेते. काॅंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने राम मंदिर आंदाेलनाचा पराभव केला आहे. अयाेध्येत आंतरराष्ट्रय विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना अजून याेग्य माेबदला मिळालेला नाही. अहमदाबादमध्ये २ जुलै राेजी काँग्रेसच्या कार्यालयाची ताेडफाेड करण्यात आली हाेती.

‘पंतप्रधान अयाेध्येतून लढणार हाेते’

राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान अयाेध्येतून लाेकसभा निवडणूक लढविणार हाेते. मला अयाेध्येच्या खासदाराने सांगितले की, तेथे तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले. 

मात्र, अयाेध्येतून लढल्यास पराभूत व्हाल, असे त्यांना पाहणी करणाऱ्यांनी सांगितले होते. वाराणसीतूनही १ लाख मतांनीच जिंकून वाचले, असा दावा राहुल यांनी केला.  

अटक झालेल्या कार्यकर्त्यांना भेटणार होते पण...

पाेलिसांनी अटक केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी भेटणार हाेते. त्यांची काेठडी संपणार हाेती. मात्र, पाेलिसांनी कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयीन काेठडी मागितली. त्यामुळे राहुल यांची कार्यकर्त्यांशी भेट हाेऊ शकली नाही. 

तत्पुर्वी, संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ते अहमदाबादमध्ये दाखल हाेण्यापूर्वी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पाेलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. 

गेल्या निवडणुकीत केली होती चूक

राहुल गांधी म्हणाले, गेल्यावेळी काॅंग्रेसने निवडणूक व्यवस्थित लढविली नाही. काॅंग्रेसने चूक केली हाेती. केवळ तीन महिनेच काम केले आणि चांगला परिणाम मिळाला. सध्या फक्त ५० टक्के लाेकांनाच वाटते की गुजरातमध्ये काॅंग्रेस जिंकू शकते. ज्यांना वाटत नाही त्यांचे मन वळवा, काॅंग्रेसचा विजय हाेईल, असे राहुल गांधी म्हणाले.

अयाेध्येत नाराजी

मंदिराचे उद्घाटन झाले. लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेत रथावर पाहिले. मात्र, मंदिराच्या उद्घाटन साेहळ्यात श्रीमंत उद्याेगपती दिसले; पण गरीब दिसले नाही. अयाेध्येतील काेणालाही आमंत्रण दिले नसल्याचा राग आला. भाजपमध्ये मंदिराच्या नावाखाली राजकारण केले. परंतु, अयाेध्येतच त्यांचा पराभव झाला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाAyodhyaअयोध्याGujaratगुजरात