शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 08:02 IST

अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही ‘इंडिया’ भाजपला हरवणार

अहमदाबाद : अयाेध्येत भाजपचा पराभव करुन ‘इंडिया’ आघाडीने राम मंदिर आंदाेलनाचा पराभव केला. अयाेध्येत जसा पराभव केला तसाच गुजरातमध्येही पुढील निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते व लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बाेलत हाेते.

राहुल गांधी यांनी गुजरात दाैऱ्यात भाजपवर टीका केली. ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदाेलन सुरू केले हाेते. काॅंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने राम मंदिर आंदाेलनाचा पराभव केला आहे. अयाेध्येत आंतरराष्ट्रय विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना अजून याेग्य माेबदला मिळालेला नाही. अहमदाबादमध्ये २ जुलै राेजी काँग्रेसच्या कार्यालयाची ताेडफाेड करण्यात आली हाेती.

‘पंतप्रधान अयाेध्येतून लढणार हाेते’

राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान अयाेध्येतून लाेकसभा निवडणूक लढविणार हाेते. मला अयाेध्येच्या खासदाराने सांगितले की, तेथे तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले. 

मात्र, अयाेध्येतून लढल्यास पराभूत व्हाल, असे त्यांना पाहणी करणाऱ्यांनी सांगितले होते. वाराणसीतूनही १ लाख मतांनीच जिंकून वाचले, असा दावा राहुल यांनी केला.  

अटक झालेल्या कार्यकर्त्यांना भेटणार होते पण...

पाेलिसांनी अटक केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी भेटणार हाेते. त्यांची काेठडी संपणार हाेती. मात्र, पाेलिसांनी कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयीन काेठडी मागितली. त्यामुळे राहुल यांची कार्यकर्त्यांशी भेट हाेऊ शकली नाही. 

तत्पुर्वी, संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ते अहमदाबादमध्ये दाखल हाेण्यापूर्वी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पाेलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. 

गेल्या निवडणुकीत केली होती चूक

राहुल गांधी म्हणाले, गेल्यावेळी काॅंग्रेसने निवडणूक व्यवस्थित लढविली नाही. काॅंग्रेसने चूक केली हाेती. केवळ तीन महिनेच काम केले आणि चांगला परिणाम मिळाला. सध्या फक्त ५० टक्के लाेकांनाच वाटते की गुजरातमध्ये काॅंग्रेस जिंकू शकते. ज्यांना वाटत नाही त्यांचे मन वळवा, काॅंग्रेसचा विजय हाेईल, असे राहुल गांधी म्हणाले.

अयाेध्येत नाराजी

मंदिराचे उद्घाटन झाले. लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेत रथावर पाहिले. मात्र, मंदिराच्या उद्घाटन साेहळ्यात श्रीमंत उद्याेगपती दिसले; पण गरीब दिसले नाही. अयाेध्येतील काेणालाही आमंत्रण दिले नसल्याचा राग आला. भाजपमध्ये मंदिराच्या नावाखाली राजकारण केले. परंतु, अयाेध्येतच त्यांचा पराभव झाला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाAyodhyaअयोध्याGujaratगुजरात