शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"सर्व काही बाऊन्सरसारखं घडलंय, चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचं नाटक", हिमंत बिस्वा सरमांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 19:25 IST

काँग्रेससह 19 राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. याआधी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह 19 राजकीय पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. यावर बहिष्कार घालणे निश्चित होते असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

नवीन संसद भवनाच्या बांधकामालाही विरोधकांनी विरोध केला. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, विरोधी पक्षांनी कधीच विचार केला नव्हता की ही इमारत इतक्या लवकर पूर्ण होईल. सर्व काही विरोधकांसाठी बाऊन्सरसारखे घडले आहे. केवळ चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचे नाटक करत आहेत. तसेच, वीर सावरकरांच्या जन्मदिनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे, हे देखील त्यांच्या निषेधाचे एक कारण असू शकते, असेही सरमा म्हणाले.

दरम्यान, नवीन संसद भवन उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याबाबत सर्व 19 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, या विशेष प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हा केवळ महामहिमांचा अपमानच नाही तर लोकशाहीवर थेट हल्ला आहे. तसेच, निवेदनात पुढे म्हटले आहे की, लोकशाहीचा आत्माच संसदेतून हद्दपार झाला आहे, तेव्हा आम्हाला नवीन इमारतीचे मूल्य दिसत नाही.

याचबरोबर, राष्ट्रपती हे केवळ भारताचे राष्ट्रप्रमुख नसून ते संसदेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याशिवाय संसद चालू शकत नाही. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, या निवेदनात नरेंद्र मोदींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने संसद पोकळ करत असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AssamआसामParliamentसंसद