शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

उ. भारताला पावसाने झोडपले; बिहारमध्ये विजा पडून २१ जण ठार, कोसी नदीला महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 11:23 IST

बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत

नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, बिहारात विजा कोसळून २४ तासांत २१ जण ठार झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. रोहतासमधील तुतला भवानी धाम धबधब्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने सहाजण धारेत अडकले. वनविभाग पथकांनी त्यांची सुटका केली. 

उत्तर प्रदेशच्या नेपाळ सीमेवरील जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर होत आहे. पिलीभीत, लखीमपूर खीरी, बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर आणि महाराजगंज या जिल्ह्यांतील ८०० गावांना पुराचा वेढा पडला आहे. शाहजहानपूरमधील दिल्ली-लखनौ महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे. बलरामपूरच्या प्राथमिक शाळेत ३ फुटांपर्यंत पाणी साठले आहे.

हिमाचलमध्ये १५ महामार्ग बंद

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी सकाळी १५ राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मंडीमधील ८, सिमलामधील ४ आणि कांगडामधील ३ महामार्गांचा त्यात समावेश आहे. ४७ विद्युत ट्रान्सफार्मर बंद पडले. राज्यात १९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी आहे. 

८ राज्यांमध्ये अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, हरयाणा, जम्मू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या आठ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, आणि छत्तीसगढमध्ये वादळी वाऱ्यासहस विजा कोसळण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. 

आसाम : मृतांची संख्या १०६ 

आसामात पूरस्थिती गंभीर असून, आणखी सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १०६ झाला आहे. २३ जिल्ह्यांतील १२.३३ लाख लोकांना पुराचा फटका बसला.

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्लीत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. शनिवारी सकाळी पावसामुळे दिल्लीत तापमान घसरले. मयूर विहार भागात १५.५ मिमी पाऊस पडला.

टॅग्स :Biharबिहारfloodपूर