शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

उ. भारताला पावसाने झोडपले; बिहारमध्ये विजा पडून २१ जण ठार, कोसी नदीला महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 11:23 IST

बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत

नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, बिहारात विजा कोसळून २४ तासांत २१ जण ठार झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, बिहारातील भागलपूरमध्ये गंगा आणि कोसीला महापूर आल्यामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. रोहतासमधील तुतला भवानी धाम धबधब्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने सहाजण धारेत अडकले. वनविभाग पथकांनी त्यांची सुटका केली. 

उत्तर प्रदेशच्या नेपाळ सीमेवरील जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर होत आहे. पिलीभीत, लखीमपूर खीरी, बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर आणि महाराजगंज या जिल्ह्यांतील ८०० गावांना पुराचा वेढा पडला आहे. शाहजहानपूरमधील दिल्ली-लखनौ महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे. बलरामपूरच्या प्राथमिक शाळेत ३ फुटांपर्यंत पाणी साठले आहे.

हिमाचलमध्ये १५ महामार्ग बंद

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी सकाळी १५ राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मंडीमधील ८, सिमलामधील ४ आणि कांगडामधील ३ महामार्गांचा त्यात समावेश आहे. ४७ विद्युत ट्रान्सफार्मर बंद पडले. राज्यात १९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी आहे. 

८ राज्यांमध्ये अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब, हरयाणा, जम्मू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या आठ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, आणि छत्तीसगढमध्ये वादळी वाऱ्यासहस विजा कोसळण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. 

आसाम : मृतांची संख्या १०६ 

आसामात पूरस्थिती गंभीर असून, आणखी सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १०६ झाला आहे. २३ जिल्ह्यांतील १२.३३ लाख लोकांना पुराचा फटका बसला.

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे व हवाई वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्लीत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. शनिवारी सकाळी पावसामुळे दिल्लीत तापमान घसरले. मयूर विहार भागात १५.५ मिमी पाऊस पडला.

टॅग्स :Biharबिहारfloodपूर