शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 09:10 IST

संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत.

नवी दिल्ली : उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणात अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. गत चार दिवसांत देशातील वेगवेगळ्या राज्यांत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने सांगितले की, पुढील दोन दिवस उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे जनजीवनासह चार धाम यात्रेवरही परिणाम होत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग चमोली ते जोशीमठ दरम्यान पाच ठिकाणी भूस्खलन आणि ढिगारा कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. चमोलीचे अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र नेगी यांनी सांगितले की, प्रशासनाने बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंना गौचर, कर्णप्रयाग आणि नंदप्रयाग येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरसू आणि कल्याणी येथे दरड कोसळल्याने यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे, तर पकोडनाला आणि धाराली दरम्यान ढिगाऱ्यांमुळे गंगोत्री महामार्गही बंद आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन डेब्रिज हटवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करत आहे. सिरोबगडमध्ये दरड कोसळल्याने रुद्रप्रयाग महामार्गही बंद आहे. आपत्ती निवारण्यासाठी उत्तराखंड राज्याला केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. 

यमुना नदीला ऐतिहासिक पूर, ४५ वर्षांचा विक्रम इतिहासजमा

दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरयाणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हरयाणातील हथिनी कुंड धरणातून वेगाने सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बऱ्यापैकी कोरड्या असलेल्या राजधानी दिल्लीत ऐतिहासिक पुराचे संकट ओढवले.  

हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका 

हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत.  पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरCentral Governmentकेंद्र सरकार