शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

एलआयसीच्या विभागीय व्यवस्थापकांची परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:44 IST

या परिषदेत एलआयसीच्या देशभरातील ११३ विभागांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.

मुंबई : आगामी वर्षातील व्यापाराची ध्येय धोरणे तसेच कॉर्पोेरेट रणनीती निश्चित करण्यासाठी एलआयसीच्या विभागीय व्यवस्थापकांची दोन दिवसांची परिषद मुंबईत २० ते २२ मे रोजी पार पडली.या परिषदेत एलआयसीच्या देशभरातील ११३ विभागांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. एलआयसीच्या आठ झोनचे प्रमुख, विविध विभागांचे आॅपरेशल हेडस, कॉर्पोरेट कार्यालयातील कार्यकारी संचालक आदींही यात सहभागी झाले. एलआयसीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसांच्या परिषदेत ध्येय धोरणे, रणनीती आखण्यासाठी गटचर्चा, त्यानुसार वर्षभर आखावयाचे विविध उपक्रम यावर सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी विविध सत्रे घेण्यात आली. परिषदेत विपणन, ग्राहकसेवा, माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर वर्षभराची रणनीती निश्चित करण्यात आली.एकूण विमा पॉलिसीच्या विचार करता एलआयसीकडे सध्या बाजारातील ७४.७१ टक्के वाटा आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रिमियमच्या स्वरुपात एलआयसीला १,४२,१९१ कोटी मिळाले. ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची यशस्वी पूर्तता करण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणे अभिमानास्पद राहिले आहे. या परिषदेत परिषदेत २०१८ -१९ वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.२२ मे रोजी परिषदेला आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राकेश शर्मा यांना प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी येत्या काळात एलआयसी देशभरातील कार्यालये आणि बँकेची आऊटलेट यांच्या माध्यमातून कशा उत्तम सेवा देता येतील, यावर मत मांडले. (वा. प्र)