शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:15 IST

नितीन गडकरी : भारतमाला प्रकल्प वेळेत साकारण्याचा मानस

नवी दिल्ली : देशातील पायाभूत सुविधा क्षेत्राच्या आर्थिक गरजेच्या पूर्ततेसाठी नवोन्मेषी मार्गातहत विमा क्षेत्रातील अग्रणी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) २०२४ पर्यंत महामार्ग प्रकल्पांसाठी १.२५ लाख कोटींचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी दिली.

८.४१ लाख कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला’ प्रकल्प वेळेत सुरू करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे. यातून अखिल भारतीय स्तरावर महामार्गांचे जाळे निर्माण केले जाईल. या प्रकल्पासाठी पेन्शन आणि विमा निधीसह वित्तीय पुरवठ्याच्या विविध स्रोतातून निधी उभा करण्याचा इरादा आहे. एलआयसीने एका वर्षात २५ हजार कोटी आणि पाच वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दाखविली आहे. याला एलआयसीने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या कर्जाचा उपयोग महामार्ग तयार करण्यासाठी केला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.

एलआयसीचे चेअरमन आर. कुमार यांनी मागच्या आठवड्यात गडकरी यांची भेट घेतली होती. एलआयसीकडून मिळणाऱ्या कर्जाचा उपयोग भारतमाला प्रकल्पासाठी केला जाईल. या प्रकल्पासाठी सुधारित खर्च ८.४१ लाख कोटी रुपये येईल.भारतमाला प्रकल्पासाठी सुरुवातीचा खर्च ५.३५ लाख कोटी होता. भूसंपादनामुळे खर्च वाढला. पहिल्या टप्प्यात ३४,८०० किलोमीटर व राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाच्या उर्वरित १० हजार किमीचे मार्ग होतील. भारतमाला प्रकल्पासाठी उपकर, पथ कर, भांडवली बाजार, खासगी क्षेत्राशी भागीदारी, विमा, पेन्शन निधी, विदेशात जारी केले जाणारे भारतीय चलनातील रोखे आदी मार्गाने निधी उभारला जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.

रोख्यांच्या रूपात कर्जभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एलआयसीचे अधिकारी एकत्रित कर्ज, व्याज आणि इतर तपशील ठरवतील. हे कर्ज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत रोख्यांच्या रूपात असेल. आमच्याकडे निधीची कमतरता नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा उपयोग महामार्गासाठी केला जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग