शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

IDBIला LICचा आधार; 51 टक्के समभाग विकत घेण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 23:24 IST

भारतातील सार्वजनिक बँका सध्या बुडित कर्जांच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. आयडीबीआयला एलआयसीने दिलेल्या आधारामुळे बँकेच्या स्थितीत सुधारणा होईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.

नवी दिल्ली : आयडीबीआयमधून ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बोर्डाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती अर्थव्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी दिली. सरकारी मालकीची आयडीबीआय बँक कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. भांडवल उभारण्यासाठी बँक एलआयसीला प्राधान्यकृत समभाग (प्रेफरेन्शिअल शेअर्स) विकणार आहे.एलआयसीच्या बोर्डावर असलेल्या गर्ग यांनी सांगितले की, बँकेला भांडवलाची गरज आहे. भांडवल उभारण्यासाठी बँक प्राधान्यकृत समभाग विक्री पद्धतीचा वापर करणार आहे. आयडीबीआय बँक शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. त्यामुळे या व्यवहाराची पुढची पायरी म्हणून एलआयसी सेबीशी संपर्क करणार आहे. हिस्सेदारी खरेदीस विमा नियंत्रक इरडाने याआधीच मंजुरी दिली आहे. एलआयसीला हिस्सेदारी विकण्यासाठी आयडीबीआय बँक आपल्या संचालक मंडळाची मंजुरी घेईल. त्यानंतर व्यवहाराची पुढील औपचारिकता पूर्ण केली जाईल.गर्ग यांनी सांगितले की, आयडीबीआय ही सरकारी बँक असली तरी बँकेतील सरकारची हिस्सेदारी फारच मर्यादित फक्त ५ टक्क्यांच्या आसपासच आहे. त्यामुळे सेबीच्या नियमानुसार खुला प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता नाही. गरज असेल तर खुल्या प्रस्तावाची औपचारिकता पारही पाडली जाऊ शकते. तथापि, हा फार मोठा मुद्दा नाही.> आयडीबीआयला आधाराची गरजआयडीबीआय बँकेला सध्या 55, 600 कोटी रुपयांचा तोटा बुडित कर्जांमुळे सहन करावा लागत आहे. बुडित कर्जांच्या या प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठी बँकेला सध्या पैशाचा निकड आहे. एलआयसीने टाकलेल्या या पावलामुळे सुमारे 13 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक आयडीबीआयमध्ये होणार आहे. आयडीबीआयच्या 2000 शाखांची थेट मदत मिळाल्यामुळे एलआयसीला आपली व्याप्ती वाढविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून त्याचा फायदा एलआयसीच्या ग्राहकांनाही होणार आहे. भारतातील सार्वजनिक बँका सध्या बुडित कर्जांच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. आयडीबीआयला एलआयसीने दिलेल्या आधारामुळे बँकेच्या स्थितीत सुधारणा होईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.> १३,000 कोटी मिळतीलआयडीबीआय बँकेत एलआयसीची आधीच सात ते साडेसात टक्के हिस्सेदारी आहे. बँकेत बहुतांश हिस्सेदारी व्हावी यासाठी उरलेली हिस्सेदारी खरेदी केली जाईल. या अधिग्रहणानंतर बँकेच्या संचालक मंडळावर एलआयसी आपले किमान ४ सदस्य नेमू शकेल. या व्यवहारातून बँकेला १0,000 ते १३,000 कोटी रुपये मिळतील.

टॅग्स :Indiaभारतbankबँक