शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

‘दोषी’ हायकोर्ट न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती, सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:35 IST

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या ‘इन हाऊस’ चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी

नवी दिल्ली  -  अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या ‘इन हाऊस’ चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी, असे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळविले आहे.एखाद्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची विनंती सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना करता तेव्हा त्या न्यायाधीशावर महाभियोगाची तयारी करणे अपेक्षित असते. त्याचा पहिला टप्पा म्हणून राज्यसभेचे सभापती सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने तीन न्यायाधीशांची एक समिती नेमतात. संबंधित न्यायाधीशाविरुद्धचे पुरावे पुरेसे सबळ आहे, असा अहवाल या समितीने दिला तर त्याच्याविरुद्ध महाभियोगाचा ठराव सभागृहात चर्चेसाठी आणण्यावर सभापती निर्णय घेतात.न्या. शुक्ला यांच्यावरील आरोपांची ‘इन हाऊस’ चौकशी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश न्या. इंदिरा बॅनर्जी, सिक्किम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. एस. के. अग्निहोत्री व मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. पी. के. जयस्वाल यांची समिती नेमण्यात आली होती. आरोपांमध्ये पदावरून दूर करणयाची औपचारिक कारवाई सुरु करण्याएवढे तथ्य असल्याचे या समितीने म्हटल्यानंतर सरन्यायाधीशांनी आता हे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे.‘इन हाऊस’ समितीने हा अहवाल दिला तेव्हा न्या. दीपक मिस्रा सरन्यायाधीश होते. त्यावेळी न्या. मिस्रा यांनी ‘इन हाऊस’ कारवाईनुसार तात्काळ राजीनामा द्यावा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, असे न्या. शुल्का यांना कळविले होते. न्या. शुक्ला यांनी तसे करण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्याकडील सर्व न्यायालयीन काम काञून घ्यावे, असे सरन्यायाधीशांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कळविले. त्यानंतर न्या. शुक्ला प्रदीर्घ रजेवर गेले होते. यंदाच्या २३ मार्च रोजी न्या. शुक्ला यांनी आपल्याला पुन्हा न्यायालयीन काम सुरु करू द्यावे, अशी विनंती सरन्याायधीश न्या. गोगोई यांना केली.न्या. गोगोई यांनी ते पत्र उचित कारवाईसाठी मुख्य न्यायाधीशांकडे पाठवून दिले होते. या पार्श्वभूमीवर आता न्या. गोगोई यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले असून न्या. शुक्ला यांना कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायालयीन काम करू दिले जाऊ शकत नसल्याने त्यांना पदावरून दूर करण्याची कारवाई सुरु करण्याची विनंती केली आहे.कशाबद्दल होतेय कारवाई?उत्तर प्रदेशच्या अ‍ॅडव्होकेट जनरलसह दोघांनी केलेल्या तक्रारींवरून न्या. शुक्ला यांच्याविरुद्द ‘इन हाऊस’ चौकशी केली गेली होती. या तक्रारींमध्ये असा आरोप होता की, दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असूनही उच्च न्यायालयात न्या. शुक्ला यांनी त्या महाविद्यालयांना प्रवेश खुले केले होते. हे न्यायालयीन औचित़्याला धरून नसल्याने न्या. शुक्ला यांचे वर्तन न्यायाधीश्पदाला साजेशे नव्हते व त्यामुळे त्यांनी आपल्या पदाच्या श्पथेचा तर भंग केलाच पण न्यायालयाच्या प्रतिष्ठेस व विश्वासार्हतेसही कमीपणा आणला, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईGovernmentसरकार