शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

शरद पवार, उद्धव ठाकरेंसह नऊ विरोधी नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, लोकशाहीबाबत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 05:52 IST

वाचा काय म्हटलंय त्यांनी पत्रात.

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे दिसून येते की, भारत लोकशाही देशातून हुकूमशाही राजवटीत बदलला आहे, अशी टीका नऊ विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे.

मनीष सिसोदिया यांना शनिवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्या जामीन अर्जावर येथे सुनावणी होणार होती; मात्र न्यायालयाने जामिनावरील निर्णय १० मार्चपर्यंत राखून ठेवत त्यांना आणखी दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. 

आपचे नेते आणि दिल्ल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे राजधानीसह देशातील वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. या कारवाईविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी निदर्शने केली आहेत. 

ते नऊ नेते कोण?बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आरजेडी नेते तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावतीने पत्र पाठवण्यात आले.

पत्रात काय म्हटले?पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्हाला खात्री आहे की, भारत हा लोकशाही देश आहे असे तुम्हाला अजूनही वाटते. विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सींचा मनमानी वापर दाखवतो की, आपण लोकशाहीतून हुकूमशाहीत बदललो आहोत. मनीष सिसोदिया यांना गैरव्यवहाराच्या कथित आरोपाखाली आणि तेही कोणतेही पुरावे न दाखवता अटक करण्यात आली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीdemocracyलोकशाही