- नितीन अग्रवाल, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केलेल्या आरोपांवरून भाजप काँग्रेसवर कायदेशीर कारवाई करू शकते. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काळ््या पैशांवर कठोरपणे होत असलेली कारवाई आणि मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसचा जळफळाट होत आहे, असे गुरुवारी म्हटले.भाजपने रोख तीन कोटी रुपये लखनौला पाठवले असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर प्रसाद म्हणाले की जर पुरावे असतील तर काँग्रेसने ते नीट मांडावेत. निराधार आरोप केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू.
काँग्रेसवर कारवाई करू
By admin | Updated: December 30, 2016 02:29 IST