शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

PM Narendra Modi on Coronavirus: 'रविवारी पाच वाजता करूया घंटानाद; 'त्या' राष्ट्ररक्षकांना देऊया दाद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 21:21 IST

PM Narendra Modi on Coronavirus: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवादराष्ट्ररक्षकांसाठी रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटं घंटानाद करू- मोदीयेत्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचं जगभरातलं वाढतं थैमान, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशवासीयांनी येत्या रविवारी जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सकाळी ७ ते रात्री ९ वाजता सर्वांनी घरीच थांबावं आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.  गेल्या दोन महिन्यांपासून काही व्यक्ती अविरत काम करत आहेत. सर्वसामान्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी या व्यक्ती अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांचं आभार येत्या रविवारी मानूया, अशी भावनिक साद मोदींनी घातली. मागील दोन महिन्यांपासून काही माणसं दिवसरात्र काम करताहेत. सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मी यांचं काम सुरूच आहे. दुसऱ्यांसाठी त्यांचं काम सुरू आहे. त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असूनही ते आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. ही मंडळी राष्ट्ररक्षक आहेत. देश त्यांचा आभारी आहे. आपण येत्या रविवारी त्यांना धन्यवाद देऊ.. संध्याकाळी पाच वाजता दरवाजा, खिडकी, गॅलरीत ५ मिनिटं उभे राहून त्यांचे आभार मानू. टाळ्या, थाळ्या, घंटा त्यांना अभिवादन करू. त्यांना सलाम करू, अशी भावनिक साद त्यांनी घातली.  येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू'  करण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजता जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं मोदींनी म्हटलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत, याची तपासणी 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून करूया, अशी साद त्यांनी घातली. युद्धाच्या परिस्थितीत ब्लॅकआऊट केलं जायचं. शत्रू राष्ट्रांना शहरं, गावं दिसू नये म्हणून घरातल्या लाईट्स बंद केल्या जायच्या. काचांना काळे पडदे लावले जायचे. युद्ध संपल्यानंतरही काही महापालिकांनी ब्लॅकआऊटचं मॉकड्रिल सुरू ठेवलं, याचा संदर्भ देत मोदींनी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळण्यात यावा, अशी साद घातली. २२ मार्चला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. देशाच्या हितासाठी लोकांनी घरी राहावं. राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचं नेतृत्व करावं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी