शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

विजय मल्ल्यांकडून पै - पै वसूल करू

By admin | Updated: March 18, 2016 04:07 IST

हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पाश आवळण्यास सुरुवात केल्यावर परदेशात निघून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सरकार ‘फरार’ मानते का, याविषयी

नवी दिल्ली : हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी बँकांनी पाश आवळण्यास सुरुवात केल्यावर परदेशात निघून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना सरकार ‘फरार’ मानते का, याविषयी स्पष्ट भाष्य करण्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी टाळले. मात्र सरकारी बँका मल्ल्यांकडून थकीत कर्जांची पै न पै वसूल करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.एका कार्यक्रमात मल्ल्यांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली म्हणाले की, मल्ल्या यांच्या कंपन्यांनी थकविलेल्या कर्जांची वसुली असो अथवा त्यासंबंधीचा तपास असो, प्रत्येक संस्था नेटाने काम करीत आहे. वित्तमंत्री म्हणाले की, मल्ल्यांच्या प्रकरणाची तथ्ये अगदी सुस्पष्ट आहेत. प्रत्येक सरकारी संस्था त्यांच्यावर कडक कारवाई करील. बँका त्यांच्याकडून पै न पै वसूल करतील. मल्ल्यांच्या प्रकरणाने देशाच्या बँकिंग आणि खासगी क्षेत्राचीही बदनामी झाली असल्याचे मतही जेटली यांनी व्यक्त केले. वित्तमंत्री म्हणाले की,पोलाद, वस्त्रोद्योग, महामार्ग, पायाभूत क्षेत्रातील आर्थिक मंदी पाहता सरकार अनुत्पादक संपत्तीमुळे (बुडित कर्ज)निर्माण झालेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. वैयक्तिक पातळीवर कर्जाची मोठी रक्कम दिली जात असून अशा रकमेची परतफेड न करता काही लोक गैरवर्तन करताना आढळून येतात. त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षा ठेव नसते, ही चिंतेची बाब आहे. कायदेशीर उत्तरदायित्वाखेरीज नैतिक आणि आचारणासंबंधी मुद्देही असतात, असे सांगून जेटली यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँका बळकट होण्यासाठी सरकारला तातडीने पावले उचलण्याची गरज पाहता मी बँकांच्या पुनर्भांडवलीकरणावर भर देत आहे.‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव बारगळलाबंद पडलेल्या मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सच्या मुंबईतील ‘किंगफिशर हाऊस’ या मुख्यालयाच्या इमारतीचा लिलाव करून थकीत कर्जापैकी काही रक्कम वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न गुरुवारी फोल ठरला.स्टेट बँक आॅफ इंडियासह इतर सरकारी बँकांनी या कंपनीस दिलेले 6963कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. स्टेट बँकेच्या एसबीआय कॅप ट्रस्टीज या उपकंपनीने ‘सरफासी’ कायद्याचा आधार घेऊन २,४०१ चौ. मीटर क्षेत्रफळाचे ‘किंगफिशर हाऊस’ गेल्या वर्षी ताब्यात घेतले होते.स्टेट बँक कॅपने १५० कोटी एवढी राखीव किंमत ठेवून या इमारतीचा ई-लिलाव पुकारला होता. परंतु त्यात एकही बोली आली नाही.विजय मल्ल्यांनी आरसीबी सोडलीकर्जाच्या वादात अडकलेल्या विजय मल्ल्या यांनी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आपल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आरसीबीने बीसीसीआयला मल्ल्या यांनी संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे पत्राद्वारे कळवले. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्चलाच आयपीएल संचालन समितीला आरसीबीचे अधिकारी रसेल अ‍ॅडम्स यांचा ई-मेल मिळाला होता. मल्ल्यांचे भारतात परतणे अनिश्चितचौकशीसाठी ईडीपुढे जातीने हजर होण्यासाठी एप्रिलपर्यंतची वेळ मागितल्याने मल्ल्या उद्या शुक्रवारी भारतात परत येण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. जबाब नोंदविण्यासाठी १८ मार्च रोजी जातीने हजर राहण्याचे समन्स मल्ल्यांना काढण्यात आले होते. परंतु समन्सनुसार आपल्याला उद्या शुक्रवारी हजर होणे जमणार नाही, असे मल्ल्या यांनी तपास अधिकाऱ्यास कळविले असून एप्रिलपर्यंतची वाढीव मुदत मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले.