शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

आम्हालाही 'अच्छे दिन' येऊ द्या!

By admin | Updated: December 29, 2015 08:52 IST

नानाविध कारणांनी प्रसारमाध्यमांतून टिका-टिप्पणीची संवय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्याच परिवारातील कुरबुरींमुळे वाईट प्रसिद्धीला तोंड द्यावे लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २९ - नानाविध कारणांनी प्रसारमाध्यमांतून होणार्‍या टिका-टिप्पणीची संवय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्याच परिवारातील कुरबुरींमुळे वाईट प्रसिद्धीला तोंड द्यावे लागणार आहे. संघाच्या 'ऑर्गनायझर' आणि 'पान्चजन्य' या दोन मुखपत्रांमधील कर्मचार्‍यांनी पगार आणि कार्यालयीन कामाच्या बाबतीत होत असलेल्या अन्यायाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून 'आम्हालाही अच्छे दिन येऊ द्या की', असे साकडे घातले आहे.
संघाच्या या इंग्रजी आणि हिंदी मुखपत्रांचे प्रकाशन 'भारत प्रकाशन (दिल्ली) लि.' या संघ परिवारातील कंपनीकडून केले जाते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्यानंतर या कंपनीच्या व्यवस्थापनातही बदल झाले व व्यवस्थापकीय संचालक परमानंद मोहरिया यांच्या धुरिधत्वाने कंपनीचा कारभार सुरु झाला. 
या नव्या व्यवस्थापनाने अन्याय्य आणि पक्षपाती धोरण स्वीकारल्याने या प्रशासन संस्थेतील वातावरण कलुषित झाले असल्याने भागवत यांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती या मुखपत्रांच्या कर्मचार्‍यांनी केली आहे. २0 कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या असलेले हिंदीतील हे पत्र भागवत यांना २ डिसेंबर रोजी लहिले गेले आहे.
पत्रात हे कर्मचारी भागवत यांना लिहितात: नवी वेतनश्रेणी लागू करताना डावे-उजवे केले गेले, अनुभवी लोकांना निकम्मे ठरवून सक्तीने नवृत्त केले गेले, असलेले वेतन नीटपणे न देता लठ्ठ पगारांवर काही नवे लोक आणले गेले, अशी तक्रार करत या पत्रात चार कर्मचार्‍यांवर कसा अन्याय केला गेला याची उदाहरणेही दिली आहेत.
एरवी घरची धुणी चव्हाट्यावर धुण्याची संघाची संस्कृती नाही. शिवाय सूडाने कारवाई होण्याच्या भीतीने जाहीर बभ्रा न करता किंवा न्यायालयात न जाता एक कुटुंबप्रमुख या नात्याने या कर्मचार्‍यांनी प्राप्त परिस्थिती भागवत यांच्या कानावर घातली आहे.
अती झाले तर नाईलाजाने कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल, असे लिहिताना हे कर्मचारी पत्रात म्हणतात: घरात कशाची कमतरता असेल तर कुटुंबातील सर्व जण आहे त्यात भागवून घेतात. आम्हीही याच कौटुंबिक भावनेने कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हा तुटपुंजा पगारही प्रसंगी हप्त्याने घेतला व पगारवाढीसाठी कधी कुरकूर केली नाही. परिस्थितीची जाण ठेवून आम्ही संतुष्ट होतो व समाधानीही होतो. पण आता परिस्थिती तशी नाही. कंपनी नफ्यात आहे.या पत्राची प्रत सरकार्यवाह भैय्याजी जोशी, चार सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाळ, भागय्या व सुरेश सोनी यांच्याखेरीज अ.भा. प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनाही पाठविण्यात आली आहे. 
६८ वर्षांचा इतिहास 
संघाचे 'ऑर्गनायझर' हे इंग्रजी मुखपत्र साप्ताहिकाच्या स्वरूपात जुलै १९४७ मध्ये सुरु झाले.भारत प्रकाशनचे नवे व्यवस्थापन येण्याच्या काही महिने आधी म्हणजे गेल्या एप्रिलमध्ये त्याचे नियतकालिकाच्या रूपाने 'रिलॉन्च' केले गेले.
ऑर्गनायझर'नंतर काही महिन्यांनी १४ जानेवारी १९४८ रोजी 'पान्चजन्य'हे हिंदी मुखपत्र सुरु झाले. अटल बिहारी बाजपेयी त्याचे पहिले संपादक होते.