शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:08 IST

परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. 

ब्राह्मण समाजात जन्मदर वाढवण्यासंदर्भात परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेले विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राजोरिया म्हणाले की, ज्या कुटुंबात चार मुले जन्माला घातली जातील, त्यांना १ लाख रुपये दिले जातील. ब्राह्मण समाजातील तरुणांनी कमीत कमी चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, नाहीतर दुसऱ्या धर्माचे लोक देशावर कब्जा करतील, असे विधान त्यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मध्य प्रदेशातील भोपालमध्ये आयोजित एका कार्यक्रमात परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया बोलत होते. 

"इतर धर्मियांची संख्या वाढत आहे, कारण आपण (ब्राह्मण) आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं बंद केलं आहे. मला तरुणांकडून आशा आहे. आपण ज्येष्ठ लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही. तरुणांनी लक्ष देऊन ऐकावं. भावी पिढ्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात. पण, आजकालचे तरुण आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर एक मूल जन्माला घालतात. त्यांना जास्त मुलं नकोय. यामुळे येणाऱ्या काळात समस्या निर्माण होतील. मी आवाहन करतो की, तुम्हाला कमीत कमी चार मुलं असायला हवीत", असे बोर्डाचे अध्यक्ष राजोरिया म्हणाले. 

"हालअपेष्टा होऊद्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका"

"तरुण अधूनमधून म्हणत असतात की, शिक्षण महाग झाले आहे. पण, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही महागाईत हालअपेष्टा होऊद्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका. नाहीतर दुसऱ्या धर्माचे लोक या देशावर कब्जा करतील", असेही त्यांनी म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही घटत्या जन्मदराबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्या समुदायचा जन्मदर घटत जातो, तो पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मोहन भागवत म्हणाले होते. हिंदू धर्मियांनी जास्त मुलं जन्माला घालण्याच्या भूमिका यापूर्वीही अनेक व्यक्तींनी अनेकदा मांडल्या आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशbrahman mahasanghब्राह्मण महासंघReligious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज