शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:08 IST

परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. 

ब्राह्मण समाजात जन्मदर वाढवण्यासंदर्भात परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेले विधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राजोरिया म्हणाले की, ज्या कुटुंबात चार मुले जन्माला घातली जातील, त्यांना १ लाख रुपये दिले जातील. ब्राह्मण समाजातील तरुणांनी कमीत कमी चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, नाहीतर दुसऱ्या धर्माचे लोक देशावर कब्जा करतील, असे विधान त्यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मध्य प्रदेशातील भोपालमध्ये आयोजित एका कार्यक्रमात परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया बोलत होते. 

"इतर धर्मियांची संख्या वाढत आहे, कारण आपण (ब्राह्मण) आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं बंद केलं आहे. मला तरुणांकडून आशा आहे. आपण ज्येष्ठ लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही. तरुणांनी लक्ष देऊन ऐकावं. भावी पिढ्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात. पण, आजकालचे तरुण आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर एक मूल जन्माला घालतात. त्यांना जास्त मुलं नकोय. यामुळे येणाऱ्या काळात समस्या निर्माण होतील. मी आवाहन करतो की, तुम्हाला कमीत कमी चार मुलं असायला हवीत", असे बोर्डाचे अध्यक्ष राजोरिया म्हणाले. 

"हालअपेष्टा होऊद्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका"

"तरुण अधूनमधून म्हणत असतात की, शिक्षण महाग झाले आहे. पण, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही महागाईत हालअपेष्टा होऊद्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका. नाहीतर दुसऱ्या धर्माचे लोक या देशावर कब्जा करतील", असेही त्यांनी म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही घटत्या जन्मदराबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्या समुदायचा जन्मदर घटत जातो, तो पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मोहन भागवत म्हणाले होते. हिंदू धर्मियांनी जास्त मुलं जन्माला घालण्याच्या भूमिका यापूर्वीही अनेक व्यक्तींनी अनेकदा मांडल्या आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशbrahman mahasanghब्राह्मण महासंघReligious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज