शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

श्रीमंत खासदारांनी वेतनाचा त्याग करून आदर्श ठेवावा, वरुण गांधी यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:18 IST

श्रीमंत खासदारांनी विद्यमान लोकसभेच्या उर्वरित कालावधीतील वेतनाचा त्याग करण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा तसेच खासदारांचे वेतन व भत्ते त्यांनी स्वत: न ठरविता त्यासाठी स्वतंत्र वस्तुनिष्ठ पद्धत प्रस्थापित करावी, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : श्रीमंत खासदारांनी विद्यमान लोकसभेच्या उर्वरित कालावधीतील वेतनाचा त्याग करण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा तसेच खासदारांचे वेतन व भत्ते त्यांनी स्वत: न ठरविता त्यासाठी स्वतंत्र वस्तुनिष्ठ पद्धत प्रस्थापित करावी, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केले आहे.खासदारांचे वेतन व भत्ते याविषयी कायदा असून त्यात वेळोवेळी दुरुस्ती मंजूर करून खासदार मंडळी आपले वेतन वाढवून घेत असतात. आताही सध्याचे वेतन दुप्पट व्हावे, अशी खासदारांची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर वरुण गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना हा प्रस्ताव दिला आहे.खासदार वरुण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना उद्देशून लिहितात की, श्रीमंत खासदारांनी विद्यमान १६ व्या लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी आपल्या वेतनाचा त्याग करावा म्हणून मोहीम सुरु करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. या कालावधीतील खासदारांचे वेतन व भत्ते रद्द करण्यात यावेत हे त्यादृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल. देशात आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावते आहे. एकुण राष्ट्रीय संपत्तीपैकी ६० टक्के संपत्ती एक टक्का धनिकांकडे एकवटली आहे. १९३० मध्ये हेच प्रमाण २१ टक्के इतके होते. भारतीय लोकशाहीसाठी हे घातक आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी अधिक गांभीर्याने बघून सामाजिक संवेदनशीलता दाखवायला हवी, असे वरुण गांधी पत्रात म्हणतात.दरमहा पन्नास हजार रुपये वेतन तसेच मतदारसंघासाठी ४५ हजार रुपये भत्ता तसेच अन्य भत्ते असे प्रत्येक खासदाराला मिळतात. सरकार प्रत्येक खासदारावर दरमहा २ लाख ७० हजार रुपये खर्च करत असते. लोकसभेतील ५४३ खासदारांवर २०१६ या वर्षात सरकारने वेतन व भत्त्यांपोटी १७६ कोटी रुपये खर्च केले.सधन खासदारांनी एवढे वेतन व भत्ते घेणे सयुक्तिक नाही, असे सुचविताना पत्रात वरुण गांधी यांनी आकडेवारी दिली आहे. २००९ साली ज्यांच्याकडे १० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे असे ३१९ लोकसभा खासदार होते. आता ही संख्या ४४९ झाली आहे. लोकसभेतील २४ टक्के खासदारांच्या एकुण संपत्तीचे मुल्य १०० दशलक्ष रुपये इतके आहे.अभ्यासाठी समिती नेमाज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसंबंधी इंग्लंडमध्ये जशी वैधानिक समिती नेमण्यात आली आहे, त्याच धर्तीवर खासदारांचे वेतन रद्द करणे कितपत सयुक्तिक ठरेल याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी अशी सूचनाही वरुण गांधी यांनी केली आहे.खासदारांच्या वेतनामध्ये वाढ करणे खरोखरच आवश्यक आहे का याचा अभ्यास या वैधानिक समितीने करावा, असे त्यांना वाटते.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाIndiaभारत