शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात सुरू करू द्या, अन्यथा चीन बाजार बळकावेल; अडचणीतील निर्यातदारांची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 01:50 IST

नवी दिल्ली : चीनने कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणल्यानंतर तेथील उद्योग व निर्यात पुन्हा हळूहळू सुरू केली आहे. भारतानेही निर्याताभिमुख ...

नवी दिल्ली : चीनने कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणल्यानंतर तेथील उद्योग व निर्यात पुन्हा हळूहळू सुरू केली आहे. भारतानेही निर्याताभिमुख उद्योगांना त्यांचे व्यवसाय व निर्यात थोड्याफार प्रमाणात सुरू करू द्यावी, अन्यथा पूर्वी जेथे भारत निर्यात करायचा अशा बाजारपेठा चीन बळकावेल, अशी विनंती निर्यातदारांनी केंद्र सरकारला केली आहे.

निर्यातदारांच्या संघटनेने काही दिवसांपूर्वी उद्योग व व्यापारमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करण्याखेरीज अडचणीत आलेल्या या उद्योगांना सरकार कशाप्रकारे मदत करू शकेल, याविषयीही सूचना केल्या. ‘फेडरेशन अआॅप इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन्स’चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, ‘लॉकडाउन’ सुरू असला तरी ‘सोशल डिस्टन्सिंग’ व स्वच्छता व आरोग्याच्या निकषांचे काटेकोर पालन करून तसेच ५० टक्के किंवा प्रसंगी त्याहूनही कमी कर्मचारी कामावर बोलावून आम्हाला काम सुरू करू द्या, अशी आम्ही मागणी केली.

ते म्हणाले की, पूर्वी आपण जेथे निर्यात करायचो तेथे खासकरून चीनसारख्या देशाला शिरकाव करू दिला तर त्या बाजारपेठेत पुन्हा आपल्याला पाय रोवणे कठीण होईल. आपण कोरोनाच्या संकटामुळे औषधांची निर्यात पूर्णपणे बंद केली; पण चीनने आता हळूहळू त्या देशांना औषधांची निर्यात सुरू केली आहे. भारताचा निर्यात व्यापारही लवकरात लवकर सुरू व्हावा, याबद्दल मंत्री गोयलही उत्सुक दिसले. त्यांनी आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले व सूचनाही नोंदवून घेतल्या; पण कोणतेही आश्वासन दिले नाही, असे त्या बैठकीला हजर असलेल्या आणखी एका उद्योजकाने सांगितले.

निर्यातदारांच्या इतर मागण्या

च्आधी केलेल्या निर्यातीचे पैसे मिळायचे असल्याने रोखतेची चणचण आहे. त्यामुळे निदान कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तरी सरकारने मदत करावी.

च्दरमहा १५ हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांची प्रॉ. फंडाची सर्व वर्गणी भरण्याचे सरकारने जाहीर केले आहे. पगाराची ही मर्यादा रद्द करावी.

च्कर्मचाºयांचे कामगार विमा योजनेचे (ईएसआयएस) पैसे भरण्यासही काही महिने सवलत द्यावी.

च्बीएसएएल, एमटीएनएल यासारख्या सरकारी कंपन्यांकडून हजारो कोटी रुपये येणे आहे ते लगेच देण्याची व्यवस्था करावी.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या