शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

निर्यात सुरू करू द्या, अन्यथा चीन बाजार बळकावेल; अडचणीतील निर्यातदारांची सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 01:50 IST

नवी दिल्ली : चीनने कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणल्यानंतर तेथील उद्योग व निर्यात पुन्हा हळूहळू सुरू केली आहे. भारतानेही निर्याताभिमुख ...

नवी दिल्ली : चीनने कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणल्यानंतर तेथील उद्योग व निर्यात पुन्हा हळूहळू सुरू केली आहे. भारतानेही निर्याताभिमुख उद्योगांना त्यांचे व्यवसाय व निर्यात थोड्याफार प्रमाणात सुरू करू द्यावी, अन्यथा पूर्वी जेथे भारत निर्यात करायचा अशा बाजारपेठा चीन बळकावेल, अशी विनंती निर्यातदारांनी केंद्र सरकारला केली आहे.

निर्यातदारांच्या संघटनेने काही दिवसांपूर्वी उद्योग व व्यापारमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करण्याखेरीज अडचणीत आलेल्या या उद्योगांना सरकार कशाप्रकारे मदत करू शकेल, याविषयीही सूचना केल्या. ‘फेडरेशन अआॅप इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन्स’चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, ‘लॉकडाउन’ सुरू असला तरी ‘सोशल डिस्टन्सिंग’ व स्वच्छता व आरोग्याच्या निकषांचे काटेकोर पालन करून तसेच ५० टक्के किंवा प्रसंगी त्याहूनही कमी कर्मचारी कामावर बोलावून आम्हाला काम सुरू करू द्या, अशी आम्ही मागणी केली.

ते म्हणाले की, पूर्वी आपण जेथे निर्यात करायचो तेथे खासकरून चीनसारख्या देशाला शिरकाव करू दिला तर त्या बाजारपेठेत पुन्हा आपल्याला पाय रोवणे कठीण होईल. आपण कोरोनाच्या संकटामुळे औषधांची निर्यात पूर्णपणे बंद केली; पण चीनने आता हळूहळू त्या देशांना औषधांची निर्यात सुरू केली आहे. भारताचा निर्यात व्यापारही लवकरात लवकर सुरू व्हावा, याबद्दल मंत्री गोयलही उत्सुक दिसले. त्यांनी आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले व सूचनाही नोंदवून घेतल्या; पण कोणतेही आश्वासन दिले नाही, असे त्या बैठकीला हजर असलेल्या आणखी एका उद्योजकाने सांगितले.

निर्यातदारांच्या इतर मागण्या

च्आधी केलेल्या निर्यातीचे पैसे मिळायचे असल्याने रोखतेची चणचण आहे. त्यामुळे निदान कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तरी सरकारने मदत करावी.

च्दरमहा १५ हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांची प्रॉ. फंडाची सर्व वर्गणी भरण्याचे सरकारने जाहीर केले आहे. पगाराची ही मर्यादा रद्द करावी.

च्कर्मचाºयांचे कामगार विमा योजनेचे (ईएसआयएस) पैसे भरण्यासही काही महिने सवलत द्यावी.

च्बीएसएएल, एमटीएनएल यासारख्या सरकारी कंपन्यांकडून हजारो कोटी रुपये येणे आहे ते लगेच देण्याची व्यवस्था करावी.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या