शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

हरयाणापासून महाराष्ट्र काँग्रेसने घ्यावा धडा; राहुल गांधी यांचा सल्ला; घरातील भांडणे चव्हाट्यावर आणू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 11:59 IST

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

आदेश रावल

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकांत पत्कराव्या लागलेल्या पराभवापासून धडा घेऊन महाराष्ट्रात काँग्रेसने विधानसभा निवडणुकांत अतिआत्मविश्वास न बाळगता सावधपणे पावले उचलावीत असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये सोमवारी बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी हे वक्तव्य केले.

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांत नेमकी स्थिती काय आहे हे हेरून त्याप्रमाणे काँग्रेसने पावले टाकावीत. पक्षातील तंटेबखेडे चव्हाट्यावर आणणे टाळावे. पक्षांतर्गत गट-तट असतात. हरयाणामध्ये काँग्रेसमधील गटांनी एकमेकांवर जाहीर टीका केली होती. त्यामुळे पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागले. तसा प्रसंग महाराष्ट्रात घडता कामा नये.

राहुल गांधी म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये एकजूट आहे असा संदेश जनतेपर्यंत गेला पाहिजे. आपल्या मित्रपक्षांबद्दल काँग्रेस नेत्यांनी चांगल्या शब्दांत विचार व्यक्त केले पाहिजेत. 

जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा नाही- काँग्रेसचे रणनीतीकार सुनील कानुगोलू यांनी महाराष्ट्रातील जाती-समुदाय यांच्याबद्दलची आकडेवारी दिल्लीतील बैठकीत सादर केली. - या आकडेवारीच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली. मात्र, जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण या विषयावर विचार केला जाईल, असेही ठरले.   

काँग्रेस जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य?महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी आणि बेरोजगार या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल अशी शक्यता आहे.

शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दर महिना ठराविक रक्कम, महिलांना मोफत बस प्रवास, महालक्ष्मी योजनेतून दर महिना २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करणार अशा लोकप्रिय घोषणांचा काँग्रेसच्या  जाहीरनाम्यात समावेश असू शकतो. 

त्याशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांसाठीही विविध घोषणा जाहीरनाम्यात केल्या जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘जागावाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत’भाजपच्या डावपेचांवर मात करून महाविकास आघाडी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सरकार स्थापन करेल, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये सोमवारी बैठक झाली. त्यानंतर पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत.

काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील १०, राजाजी मार्गावरील निवासस्थानी झालेल्या या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, नाना पटोले, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबतच्या काँग्रेसच्या रणनीतीबद्दल बैठकीत चर्चा झाली.  महाविकास आघाडीला विजय मिळवून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असे पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय केल्याचा आरोपगुजरातला झुकते माप देताना केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी राज्य सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस