शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Corona Virus : गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोना सक्रिय प्रकरणे; दुसरी लाट संपली की तिसरी सुरू झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 22:47 IST

Corona Virus : गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती.

नवी दिल्ली : देशात जवळपास 6 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची (Covid Active Case) संख्या 3 लाखांपेक्षा कमी झाली आहे. रविवारी देशातील कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 2,99,620 झाली होती. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry)जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती समोर आली आहे. 

आकडेवारीनुसार, आता गेल्या 191 दिवसांमध्ये सर्वात कमी सक्रिय प्रकरणे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयाने सणासुदीच्या काळात लोकांनी कोरोना संसर्गापासून जागरूक राहावे असे आवाहन केले आहे. 

गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती. दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढीदरम्यान मे महिन्यात संपूर्ण देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 37 लाखांच्या वर पोहोचली होती.

मे महिन्यानंतर काय झाली स्थिती?मे महिन्यापासून दक्षिण भारतातील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या असामान्यपणे वाढली, परंतु इतर राज्यांमध्ये प्रकरणे सामान्य राहिली. ईशान्येसह काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली होती, परंतु केरळमधील परिस्थिती चिंताजनक बनली होती. दरम्यान, संपूर्ण देशातील 55 टक्के सक्रिय प्रकरणे केरळमधील आहेत. राज्यात सध्या 1.63 लाख सक्रिय प्रकरणे आहेत.

फेब्रुवारी महिन्यासारखी परिस्थितीआता सक्रिय प्रकरणांची स्थिती जवळजवळ या वर्षी फेब्रुवारी महिन्यासारखी आहे, जेव्हा देशात दुसरी लाट सुरू झाली नव्हती. देशातील 20 राज्यांमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त आणि 10 राज्यांमध्ये 100 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. फेब्रुवारीमध्येही अशीच परिस्थिती होती. त्यावेळीही देशातील अर्ध्याहून अधिक प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रातील होती.

सणासुदीच्या काळात सतर्कतेचा इशारादरम्यान, देशात लसीकरणाचा वेगही अतिशय वेगाने वाढवण्यात आला आहे. परंतु लोकांना आरोग्य मंत्रालय आणि तज्ज्ञांकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला जात आहे की, सणांच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांवर भर देण्याचे म्हटले आहे. निष्काळजीपणामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस