शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

Corona Virus : गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोना सक्रिय प्रकरणे; दुसरी लाट संपली की तिसरी सुरू झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 22:47 IST

Corona Virus : गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती.

नवी दिल्ली : देशात जवळपास 6 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची (Covid Active Case) संख्या 3 लाखांपेक्षा कमी झाली आहे. रविवारी देशातील कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 2,99,620 झाली होती. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry)जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती समोर आली आहे. 

आकडेवारीनुसार, आता गेल्या 191 दिवसांमध्ये सर्वात कमी सक्रिय प्रकरणे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयाने सणासुदीच्या काळात लोकांनी कोरोना संसर्गापासून जागरूक राहावे असे आवाहन केले आहे. 

गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती. दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढीदरम्यान मे महिन्यात संपूर्ण देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 37 लाखांच्या वर पोहोचली होती.

मे महिन्यानंतर काय झाली स्थिती?मे महिन्यापासून दक्षिण भारतातील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या असामान्यपणे वाढली, परंतु इतर राज्यांमध्ये प्रकरणे सामान्य राहिली. ईशान्येसह काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली होती, परंतु केरळमधील परिस्थिती चिंताजनक बनली होती. दरम्यान, संपूर्ण देशातील 55 टक्के सक्रिय प्रकरणे केरळमधील आहेत. राज्यात सध्या 1.63 लाख सक्रिय प्रकरणे आहेत.

फेब्रुवारी महिन्यासारखी परिस्थितीआता सक्रिय प्रकरणांची स्थिती जवळजवळ या वर्षी फेब्रुवारी महिन्यासारखी आहे, जेव्हा देशात दुसरी लाट सुरू झाली नव्हती. देशातील 20 राज्यांमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त आणि 10 राज्यांमध्ये 100 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. फेब्रुवारीमध्येही अशीच परिस्थिती होती. त्यावेळीही देशातील अर्ध्याहून अधिक प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रातील होती.

सणासुदीच्या काळात सतर्कतेचा इशारादरम्यान, देशात लसीकरणाचा वेगही अतिशय वेगाने वाढवण्यात आला आहे. परंतु लोकांना आरोग्य मंत्रालय आणि तज्ज्ञांकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला जात आहे की, सणांच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांवर भर देण्याचे म्हटले आहे. निष्काळजीपणामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक मजबूत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस