शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पत्नीला सोडून परदेशात पळालेल्या NRI नवऱ्याला करणार फरार घोषित- मनेका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 10:59 IST

पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाणार आहे.

नवी दिल्ली- पत्नीला भारतात सोडून परदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी भारतीयांसदर्भात केंद्र सरकार कडक पावलं उचलण्याची तयारी करतं आहे. पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाणार आहे. सरकार कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत.  पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाईल. इतकंच नाही, तर भारतातील पतीच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या संपत्तीलाही सील केलं जाऊ शकतं. केंद्रीय महिला-बाल विकास मंत्रायलाने याबरोबरच बाल लैंगिक शोषण थांबविण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. सीआरपीसीमधील बदलानंतर लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंतचा गुन्हा दाखल केला जाईल. पीडित लहान असताना त्याचं लैंगिक शोषण झालं व पीडित आता बालिक असेल तर त्याचं वेळी गुन्हा दाखल केला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने एनआरआय नवरदेवांच्या फरवणुकीला चाप बसविण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी कायदा मंत्रायलाला पत्र लिहिलं आहे. विदेशात स्थायिक असलेला पती त्याच्या लग्नानंतर पत्नीला भारतात सोडून निघून जातो. कोर्टाकडून नोटीस पाठविली जाऊनही तो पुन्हा हजर होत नाही. अशा घटनांवर चाप बसविण्यासाठी या लोकांना फरार घोषित केलं जाईल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवरील फरारांच्या यादीत सामिल केलं जाईल, असं महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हंटलं. 

बाल लैंगिक शोषणाच्या कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावर मेनका गांधी यांनी म्हंटलं की, लहानपणी घटना घडली असताना पीडित बालिक झाल्यावरही त्याला न्याय मिळविण्याच्या अधिकाप आहे. यामध्ये काही जोखीम आहेत तसंच खोटी प्रकरण दाखल होण्याचीही शक्यता असल्याने त्यावर विचार केला जाणार आहे. बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्वांना न्याय मिळवून देणं, हे आमचं उद्दिष्ट्यं असल्याचं मेनका गांधी यांनी म्हंटलं.  

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी