शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:00 IST

भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा काँग्रेसलाही फटका

संजीव साबडे

केरळमध्ये मतदार दर पाच वर्षांनी सत्ताबदल घडवून आणतात. यात आतापर्यंत एकदाही खंड पडला नव्हता. पान यंदा चमत्कार घडला. सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला मतदारांनी सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. एवढेच नव्हे, तर विधानसभेच्या १४० पैकी ९० हून अधिक जागा माकप, भाकप आणि मित्र पक्षांच्या पारड्यात टाकल्या आहेत. म्हणजेच स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहेत. यावेळी मतदार आपल्यालाच निवडून देणार, अशी काँग्रेस नेत्यांना खात्री होती. त्यातच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील जनतेने काँग्रेसला भरभरून मते दिली होती.

राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. काँग्रेसचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले होते. त्या निकालांमुळे केरळमध्ये आपली लोकप्रियता वाढली आहे, डाव्यांविषयी जनतेत रोष आहे, असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले. ते दीड वर्षे गाफिल राहिले आणि हा गाफीलपणा आता भोवला. दीड वर्षे संघटना बांधणी केली असती, नेते, कार्यकर्ते सक्रिय राहिले असते, तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. कोरोनाचा संसर्ग सुरुवातीला झाला केरळमध्येच. तेव्हापासून आजपर्यंत डाव्या आघाडीच्या सरकारने, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी खूप चांगले काम केले. संसर्ग रोखण्याकाठी त्यांनी केलेल्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली. 

काँग्रेसला गटबाजी भोवलीn गेल्या सहा महिन्यांपासून केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा गाजतो आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी, राजकारणी व प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले गेले. त्यावरून डाव्या सरकारवर हल्ला चढवणे काँग्रेसला शक्य होते. पण तेही काँग्रेसने केले नाही. राहुल गांधी आपल्याला बहुमत मिळवून देणार या भ्रमात ते राहिले आणि मुख्यमंत्री कोणी व्हायचे यावरून नेत्यांची गटबाजी सुरू झाली.

डाव्यांना फायदा दुसरीकडे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांचे सरकार अधिकाधिक लोकोपयोगी यिजना राबवत राहिले. कोरिया संसर्गाच्या व लॉकडाउनच्या काळात त्यांनी खूपच मदत केली. त्यामुळे लोकांना आपापसात न भांडणाऱ्या डाव्यांचे सरकार भावले. 

शिवाय डावे आणि काँग्रेस यांच्यात मतविभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपला मिळेल, हे विजयन आणून त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारांना नीट पटवून दिले. डाव्यांना दूर करण्यासाठी काँग्रेसला मते देण्याने भाजप वाढण्यापेक्षा आहे तेच बरे आहे, असे मतदारांनी ठरविले. भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा फटकाही काँग्रेसला बसला, असे स्पष्टपणे दिसत आहे.

 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१KeralaकेरळElectionनिवडणूक