शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:00 IST

भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा काँग्रेसलाही फटका

संजीव साबडे

केरळमध्ये मतदार दर पाच वर्षांनी सत्ताबदल घडवून आणतात. यात आतापर्यंत एकदाही खंड पडला नव्हता. पान यंदा चमत्कार घडला. सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला मतदारांनी सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. एवढेच नव्हे, तर विधानसभेच्या १४० पैकी ९० हून अधिक जागा माकप, भाकप आणि मित्र पक्षांच्या पारड्यात टाकल्या आहेत. म्हणजेच स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहेत. यावेळी मतदार आपल्यालाच निवडून देणार, अशी काँग्रेस नेत्यांना खात्री होती. त्यातच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील जनतेने काँग्रेसला भरभरून मते दिली होती.

राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. काँग्रेसचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले होते. त्या निकालांमुळे केरळमध्ये आपली लोकप्रियता वाढली आहे, डाव्यांविषयी जनतेत रोष आहे, असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले. ते दीड वर्षे गाफिल राहिले आणि हा गाफीलपणा आता भोवला. दीड वर्षे संघटना बांधणी केली असती, नेते, कार्यकर्ते सक्रिय राहिले असते, तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. कोरोनाचा संसर्ग सुरुवातीला झाला केरळमध्येच. तेव्हापासून आजपर्यंत डाव्या आघाडीच्या सरकारने, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी खूप चांगले काम केले. संसर्ग रोखण्याकाठी त्यांनी केलेल्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली. 

काँग्रेसला गटबाजी भोवलीn गेल्या सहा महिन्यांपासून केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा गाजतो आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी, राजकारणी व प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले गेले. त्यावरून डाव्या सरकारवर हल्ला चढवणे काँग्रेसला शक्य होते. पण तेही काँग्रेसने केले नाही. राहुल गांधी आपल्याला बहुमत मिळवून देणार या भ्रमात ते राहिले आणि मुख्यमंत्री कोणी व्हायचे यावरून नेत्यांची गटबाजी सुरू झाली.

डाव्यांना फायदा दुसरीकडे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांचे सरकार अधिकाधिक लोकोपयोगी यिजना राबवत राहिले. कोरिया संसर्गाच्या व लॉकडाउनच्या काळात त्यांनी खूपच मदत केली. त्यामुळे लोकांना आपापसात न भांडणाऱ्या डाव्यांचे सरकार भावले. 

शिवाय डावे आणि काँग्रेस यांच्यात मतविभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपला मिळेल, हे विजयन आणून त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारांना नीट पटवून दिले. डाव्यांना दूर करण्यासाठी काँग्रेसला मते देण्याने भाजप वाढण्यापेक्षा आहे तेच बरे आहे, असे मतदारांनी ठरविले. भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा फटकाही काँग्रेसला बसला, असे स्पष्टपणे दिसत आहे.

 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१KeralaकेरळElectionनिवडणूक