शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सरकारी नोकरी सोडून कचोरी-समोसे विकले; मुलांना IIM-IITमध्ये शिकवले, 10 जणांना दिला रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 10:59 IST

सत्यकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी मी डीटीसीमध्ये जीआय लेव्हल ऑफिसर होतो.

जर एखाद्याच्या कुटुंबाचे दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न असेल, तरी तो समोसे आणि कचोऱ्यांचे दुकान का काढेल?, हा प्रश्न सत्यकुमार यांच्या कचोऱ्या खायला जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतो. एवढंच नाही तर चांगली सरकारी नोकरी सोडून छोटासा व्यवसाय का सुरू केला हेही समजत नाही. विशेष म्हणजे त्यांच्या समोसे आणि कचोरीची चव अप्रतिम आहे. ग्राहक त्यांच्या खाद्यपदार्थांची खूप प्रशंसा करतात.

सत्यकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी मी डीटीसीमध्ये जीआय लेव्हल ऑफिसर होतो. नोकरी सोडल्यानंतर मी दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर मी येथे समोसे बनवण्यास सुरुवात केली. नोकरीच्या तुलनेत या व्यवसायात नफा जास्त असल्याने मी हे करण्याचा निर्णय घेतला.

शर्मा यांनी सांगितले की, माझ्या मुलाने आयआयटी दिल्लीतून आणि दुसऱ्याने आयआयएममधून शिक्षण घेतले आहे. सध्या ते बंगळुरू येथील एका कंपनीत वार्षिक 40 लाख पगारावर काम करत आहेत. त्यांची पत्नीही याच कंपनीत त्याच पगारावर काम करत आहे. आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतल्यानंतर लहान मुलगा 35 लाखांच्या पॅकेजवर काम करत आहे.

घरामध्ये करोडोंचे वार्षिक पॅकेज आहे, मग तुम्ही सेवानिवृत्ती का घेत नाही, असा सवाल विचारला. तर सत्य कुमार यांनी उत्तर दिले की मी आता निवृत्ती घेतली तर येथे काम करणारे दहा लोक बेरोजगार होतील. याशिवाय लोकांनी कष्ट करत राहावे, म्हणून मी निवृत्ती घेत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी