शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, पुढील काही तास ​​मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 16:16 IST

Tamilnadu Rain: गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडे उन्मळु पडली असून, बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे.

चेन्नई:तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यांत रस्त्यांवर पाणी साचले, तर गुरुवारी झालेल्या पावसामुळे चेन्नई विमानतळावरील येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा गुरुवारी दुपारी 01.15 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विल्लुपुरम, कुड्डालोर, कल्लाकुरीची, कृष्णगिरी, धर्मपुरी, नमक्कल, पेरांबलूर, अरियालूर, चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि सालेम जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

चेन्नईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील 13 भुयारी मार्गातील तुंबलेले पाणी काढण्यात आले असून, 160 तोडलेली झाडेही काढण्यात आली आहेत. गेल्या 4 दिवसांत राज्यातील 20 लाख लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या(IMD) चेन्नई युनिटच्या उपमहासंचालकांनी पावसाची माहिती शेअर केली आहे. त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान ते आज संध्याकाळी चेन्नईमधून जाईल. त्यामुळे जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील 6 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.

गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईतील अनेक भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडेही उन्मळुन पडलेली दिसली. अनेकांचा घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. हवामान खात्याने सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र 11 नोव्हेंबरच्या संध्याकाळी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर जाण्याची शक्यता आहे. हवामानाच्या या प्रवृत्तीमुळे पुढील तीन ते चार दिवस तामिळनाडूच्या मोठ्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 नोव्हेंबर रोजी निलगिरी हिल्स, कोईम्बतूर, सेलम, तिरुपत्तूर आणि वेल्लोरमध्ये पाऊस अपेक्षित आहे.

ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडूमध्ये 1 ऑक्टोबरपासून सरासरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील 90 प्रमुख जलाशयांपैकी 53 जलाशयांमध्ये पाणी 76 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या कालावधीत तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये 38 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली, जी 25 सेंटीमीटरच्या सामान्य पातळीपेक्षा 51 टक्के जास्त आहे.हवामान खात्याने सांगितले की 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार, तर बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूRainपाऊसfloodपूर