शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

सोनिया गांधींचे नेतृत्वच ‘काँग्रेसचे ऐक्य’ राखेल

By admin | Updated: May 23, 2016 04:00 IST

सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच नायडू यांचे हे विधान आले आहे.एका मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले की, नेतृत्व त्यांची अंतर्गत बाब आहे. सोनियांमुळे काँग्रेस एक आहे, एवढेच मी म्हणू शकतो. त्यांचे नेतृत्व नसते तर काँग्रेसची शकले उडाली असती. मला घराणेशाही मान्य नाही, तरीपण हे माझे स्पष्ट मत आहे. लोकशाहीत घराणेशाही ‘धोकादायक’ आहे; पण काँग्रेस आणि काही लोकांसाठी ती ‘चविष्ट’ आहे. सोनिया गांधी यांनीच पक्षात ऐक्य राखले, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाचा उल्लेख करून ते म्हणाले की, हे निकाल पाहता एक नेता म्हणून त्यांचे नेतृत्व यशस्वी झाले नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी ‘आत्मपरीक्षणा’चे आवाहन केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा आमच्या चिंतेचा विषय नाही. तो त्यांचा विषय आहे. त्यांना आपली धोरणे व कार्यप्रणाली यावर नव्याने विचार करावा लागेल. कामाची प्रणाली बदलावी लागेल.पक्षात राहुल गांधी यांचे महत्त्व वाढले आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष पूर्वीपासूनच व्यावहारिकपणे पक्ष चालवत आहेत. याबाबत कोणताही संशय नाही. ते जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेही होऊ शकतात. संसदेत त्यांची काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली तर काहीच अडचण नाही. तेच गेल्या १२ वर्षांपासून कामकाज पाहत आहेत, त्यांना काँग्रेस अध्यक्ष करणार असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा!