शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींचे नेतृत्वच ‘काँग्रेसचे ऐक्य’ राखेल

By admin | Updated: May 23, 2016 04:00 IST

सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच नायडू यांचे हे विधान आले आहे.एका मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले की, नेतृत्व त्यांची अंतर्गत बाब आहे. सोनियांमुळे काँग्रेस एक आहे, एवढेच मी म्हणू शकतो. त्यांचे नेतृत्व नसते तर काँग्रेसची शकले उडाली असती. मला घराणेशाही मान्य नाही, तरीपण हे माझे स्पष्ट मत आहे. लोकशाहीत घराणेशाही ‘धोकादायक’ आहे; पण काँग्रेस आणि काही लोकांसाठी ती ‘चविष्ट’ आहे. सोनिया गांधी यांनीच पक्षात ऐक्य राखले, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाचा उल्लेख करून ते म्हणाले की, हे निकाल पाहता एक नेता म्हणून त्यांचे नेतृत्व यशस्वी झाले नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी ‘आत्मपरीक्षणा’चे आवाहन केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा आमच्या चिंतेचा विषय नाही. तो त्यांचा विषय आहे. त्यांना आपली धोरणे व कार्यप्रणाली यावर नव्याने विचार करावा लागेल. कामाची प्रणाली बदलावी लागेल.पक्षात राहुल गांधी यांचे महत्त्व वाढले आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष पूर्वीपासूनच व्यावहारिकपणे पक्ष चालवत आहेत. याबाबत कोणताही संशय नाही. ते जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेही होऊ शकतात. संसदेत त्यांची काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली तर काहीच अडचण नाही. तेच गेल्या १२ वर्षांपासून कामकाज पाहत आहेत, त्यांना काँग्रेस अध्यक्ष करणार असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा!