शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा नेते, अधिकाऱ्यांकडून काळाबाजार; सपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 08:12 IST

राज्य सरकारने यूपीला बनावट चकमकींचे केंद्र बनवले आहे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा आरोप

राजेंद्र कुमार

लखनौ : अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा खुलेआम काळाबाजार सुरू आहे. भाजपचे नेते आणि अधिकारी तेथील जमीन लुटत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येतील गरीब शेतकरी आपल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी भटकत आहेत. योगी सरकारच्या काळात पोलिस जात पाहून एन्काउंटर करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लखनौ येथे केला आहे.

अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर निशाणा साधत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत आणि आसपास मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करण्यात आली आहे. भाजप नेते आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने अयोध्येत लष्कराची जमीनही विकण्यात आली. भाजपच्या नेते, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. 

चकमकीवेळी पोलिसाने चप्पल का घातली?

यूपीमध्ये एन्काउंटरसाठी खोट्या कथा रचल्या जात आहेत. मंगेश यादव यांची हत्या करण्यात आली. त्यांना घरातून उचलून नेण्यात आल्याचे सर्वांना माहिती आहे. चकमकीच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसाने चप्पल घातली होती. उत्तर प्रदेशात खोटे एन्काउंटर होत आहेत. राज्य सरकारने यूपीला बनावट चकमकींचे केंद्र बनवले आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा