शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:19 IST

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या कारवाईची जबाबदारी असलेल्या १५ व्या कॉर्पस््चे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले की, गेले काही महिने सैन्याने सीमेपलीकडून होणाºया घुसखोरीविरुद्ध सातत्याने कारवाई केल्याने काश्मीरमधील परिस्थिती लक्षणीय सुधारली आहे. शनिवारी हाजिन भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये ओवैद, झरगार आणि मेहमूद या लष्कर-ए-तैयबाच्या तीन प्रमुख म्होरक्यांचा समावेश असून या कारवाईमुळे ‘लष्कर’चे नेतृत्व संपुष्टात आले आहे. (वृत्तसंस्था)>यंदा १९० अतिरेक्यांना टिपलेजनरल संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा आतापर्यंत लष्कराने काश्मीरमध्ये १९० अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यापैकी ११० सीमेपलीकडून आलेले होते, तर ८० स्थानिक होते. ठार केलेल्या ११० पैकी ६६ अतिरेक्यांना सीमा ओलांडताना टिपले गेले.काश्मीरच्या अंतर्गत भागात १२५ ते १३० अतिरेकी मारले गेले. यावरून सीमा ओलांडताना जसे अतिरेकी मारले जात आहेत तसेच आधीपासून येऊन राज्याच्या अंतर्गत भागांत गेलेल्यांनाही टिपले जात आहे, हे यावरून दिसते, असे ते म्हणाले.दहशतवादाकडे वळलेल्या अनेक तरुणांना त्या वाटेवरून परत आणण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अनेकांची तशी इच्छा असते पण त्यासाठी नेमके काय करावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे.शुक्रवारी श्रीनगरजवळ झाकुरा येथे झालेला हल्ला ‘इसिस’ने केल्याचा दावा या दहशतवादी संघटनेच्या‘अ‍ॅमॅक’ वृत्तसंस्थेने केला होता.जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी मात्र याचा इन्कार केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी