शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:19 IST

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या कारवाईची जबाबदारी असलेल्या १५ व्या कॉर्पस््चे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले की, गेले काही महिने सैन्याने सीमेपलीकडून होणाºया घुसखोरीविरुद्ध सातत्याने कारवाई केल्याने काश्मीरमधील परिस्थिती लक्षणीय सुधारली आहे. शनिवारी हाजिन भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये ओवैद, झरगार आणि मेहमूद या लष्कर-ए-तैयबाच्या तीन प्रमुख म्होरक्यांचा समावेश असून या कारवाईमुळे ‘लष्कर’चे नेतृत्व संपुष्टात आले आहे. (वृत्तसंस्था)>यंदा १९० अतिरेक्यांना टिपलेजनरल संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा आतापर्यंत लष्कराने काश्मीरमध्ये १९० अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यापैकी ११० सीमेपलीकडून आलेले होते, तर ८० स्थानिक होते. ठार केलेल्या ११० पैकी ६६ अतिरेक्यांना सीमा ओलांडताना टिपले गेले.काश्मीरच्या अंतर्गत भागात १२५ ते १३० अतिरेकी मारले गेले. यावरून सीमा ओलांडताना जसे अतिरेकी मारले जात आहेत तसेच आधीपासून येऊन राज्याच्या अंतर्गत भागांत गेलेल्यांनाही टिपले जात आहे, हे यावरून दिसते, असे ते म्हणाले.दहशतवादाकडे वळलेल्या अनेक तरुणांना त्या वाटेवरून परत आणण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अनेकांची तशी इच्छा असते पण त्यासाठी नेमके काय करावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे.शुक्रवारी श्रीनगरजवळ झाकुरा येथे झालेला हल्ला ‘इसिस’ने केल्याचा दावा या दहशतवादी संघटनेच्या‘अ‍ॅमॅक’ वृत्तसंस्थेने केला होता.जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी मात्र याचा इन्कार केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी