शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

प्रियांका गांधींसह नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, नंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 07:02 IST

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य नेते राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य नेते राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली. अटक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांत सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, आनंद शर्मा, अजय माकन, के. सुरेश, जयराम रमेश, कुमार शैलजा, रणदीप सिंग सुरजेवाला, एच. के. पाटील, पवन कुमार बन्सल, विवेक बन्सल, राजीव सातव, कुलजीत नाग्रा, डॉ. चेला कुमार, भक्त चरण दास, देवेंदर यादव, मनीष चत्रथ, दीपेंदर सिंग हुडा, कुलदीप बिष्णोई, सुनील जाखड, गोविंद सिंग दोतासरा, सयद नासीर हुसैन, प्रदीप तमटा, सुष्मिता देव आणि इतरांचा समावेश आहे. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली. 

...तर त्यांनाही अतिरेकी ठरवतील -राहुल गांधी तीनही कृषी कायदे सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोपवून परत आल्यानंतर ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी टीका ऐकण्यासाठी तयार नाहीत. जो कोणी त्यांच्या विरोधात उभा होतो त्याला अतिरेकी ठरविले जाते. मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत का असेनात. जर तेही त्यांच्याकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करतील तर मोदी त्यांनाही अतिरेकी ठरवतील. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संप