शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नेत्यांच्या घरी जाऊन हेरगिरी होत नाही - अरुण जेटली

By admin | Published: March 16, 2015 11:48 AM

राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे. हेरगिरी करायचीच असती तर दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेली नसती, त्यामुळे विरोधकांनी सुरक्षा व्यवस्थेचे राजकारण करु नये असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांची एक पथक गेले होते. राहुल गांधी कसे दिसतात, उंची, डोळ्यांचा, ते कोणते शुज घालतात याविषयीची माहिती पोलिसांनी घेतली होती. या प्रकरणावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करुन सत्ताधा-यांवर हेरगिरीचे आरोप केले. चौकशीच्या माध्यमातून सरकार राहुल गांधींची हेरगिरी करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने यावर संसदेत उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. अखेरीस केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत उत्तर दिले. १९८७ पासून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक अति महत्त्वाच्या व्यक्तींची सखोल माहिती जमा करत असून सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची असते असे अरुण जेटलींनी सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधांनांची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या केली होती त्यावेळी माजी पंतप्रधानांची ओळख त्यांच्या बुटमुळे पटली होती असे जेटलींनी निदर्शनास आणून दिले.  दिल्ली पोलिस ५२६ अति महत्त्वाच्या व्यक्तींची नियमित माहिती घेतात. युपीएसोबतच अटलबिहारी वाजपेयींच्या  नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या  कालावधीतही ही माहिती घेतली जात होते. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी आणि माझीही माहिती दिल्ली पोलिसांनी वेळोवेळी घेतली होती असे जेटलींनी स्पष्ट केले. विरोधक या चौकशीवरुन नाहक गदारोळ घालत आहे असेही त्यांनी नमूद केले.