शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अयोध्येतील जमिनी कवडीमोल दराने लाटल्या; शेतजमिनीचे सरकारी दर ७ वर्षांपासून वाढलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 05:47 IST

लष्कराच्या नावे आरक्षित असलेली जमीनही भूमाफियांनी लाटून घाेटाळा केल्याचे उघडकीस

त्रियुग नारायण तिवारी

अयाेध्या : अयाेध्या जिल्ह्यात गेल्या सात वर्षांपासून जमिनीचे सरकारी दर वाढविण्यात आलेले नाही. त्यामुळे सत्तेशी संबंधित नेते आणि अधिकाऱ्यांनी याच संधीचा फायदा उचलून शेतकऱ्यांच्या जमिनी अतिशय स्वस्तात विकत घेतल्या किंवा विकण्यात आल्या. एवढेच नव्हे तर लष्कराच्या नावे आरक्षित असलेली जमीनही भूमाफियांनी लाटून घाेटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने जमिनी रिक्त करण्याचे आदेश दिल्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील जमिनींचा दर जिल्हाधिकाऱ्यांकडून निश्चित केला जाताे. मात्र, अयाेध्येत वर्ष २०१७ पासून हे दर ठरविण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना २०१७च्या दराने जमीन विकाव्या लागल्या. नेते आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांसाेबतच सरकारचेही नुकसान झाले असून, धनाढ्य भूमाफिया मालामाल हाेत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील अनेक बडे सनदी अधिकारी आणि पाेलिस अधिकारीदेखील सामील आहेत. त्यांनी आपल्या नातेवाइकांच्या नावाने जमिनी खरेदी केल्या आहेत. अयाेध्येचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहिलेले अनुज कुमार झा यांच्या कार्यकाळात या कारभाराला सुरूवात झाली. झा यांच्या वडिलांच्या नावे एका जमिनीचा व्यवहार झाला. तत्कालीन वरिष्ठ पाेलिस अधीक्षक दीपक कुमार, सहायक पाेलिस अधीक्षक पलाश बंसल यांच्या नावाने जमिनी खरेदी करण्यात आल्या.

जमिनीचे दर अक्षरश: भिडले गगनाला

अयाेध्या जिल्ह्यातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. जमिनींच्या व्यवहारांमध्ये अयाेध्येतील सर्व लाेकप्रतिनिधी सामील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अयाेध्या विकास प्राधिकरणाने यावर्षी एक आदेश काढून या भागात काेणताही नकाशा मंजूर करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर वातावरण तापले आहे.

कुठल्या जमिनी आहेत वादात?अयाेध्येच्या पश्चिमेकडे २५ किलाेमीटरपर्यंत मगलसी, तसेच पूर्वेकडे सराय राशी या गावापर्यंत नदी किनाऱ्यालगतच्या जमिनीचे व्यवहार करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्या