शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

विधायक कार्याचा वसा घेतलेला नेता : ब्रšादेवदादा माने लोकनेते स्व. ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (सोमवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 22:55 IST

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.
जात व धर्माच्या जाणिवा असलेल्या संघटना ब्रšादेवदादा माने यांना राजकारणात मान्य नव्हत्या. कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याच्यात देवपण शोधणार्‍यांपैकी दादा नव्हते. परिश्रमपूर्वक जनसेवा व जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यकर्ता सचोटीला उतरला तरच समाजाने त्याची कदर केली पाहिजे, असा दादांचा आग्रह असायचा. तोच आग्रह राजकारण निरोगी करण्याला उपयोगी पडतो. ब्रšादेवदादा माने यांचे नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व स्वत:च्या पायावर उभे राहून साध्य झालेले आहे. कोणाच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही की, राजकारणातली त्यांची एंट्री अपघात नाही. समाजाच्या सेवेतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. राजकारणात स्थिरावले आणि विचाराने ते नेतृत्व बहरत राहिले.
एखाद्या नेत्याची कार्यपद्धती व विचारसरणी जनहिताच्या विरोधी असेल तर त्याविरोधी दादा उघडपणे भूमिका घेत असत. क˜र काँग्रेसवादी असूनही दादांनी अनेकदा काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. १९७१ साली लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. निवडणूक प्रचाराची टिळक चौकात मोठी सभा झाली. या सभेत दादांनी रंगाअण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्या निवडणुकीत त्यांनी अपार कष्ट घेतले. नवखे असूनही ग्रामीण भागात झंझावाती दौरे करीत काँग्रेसच्या विरोधात रान उठवले. त्यांचा पिंड मुळात काँग्रेसचा. तरीही अन्याय झाला की, पक्षाच्या विरोधात ते पेटून उठत असत. १९६७ साली दादांचे नातलग राजाराम ढवळे यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ब्रšादेवदादांकडे आग्रह धरीत निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांचे बंड यशस्वी ठरले. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात अनेकदा अशा घटना त्यांच्याबाबत घडल्या.
राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने रचनात्मक काम उभे करावे, अशी अपेक्षा असते. अशा रचनात्मक कामाचा राजकीय लाभ जरी त्या व्यक्तीला होण्याची शक्यता असली तरी त्या कार्याचा तो हेतू असू नये. अशी विचारसरणी ब्रšादेवदादांची होती. त्यांनी स्वत:च्या गावी कुमठे येथे आपल्या रचनात्मक कामाचा डोंगर उभारला आहे. बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एका छताखाली देणारी शिक्षण संस्था दादांनी कुमठ्यात उभी केली आहे. अनेक नेते शहरात राहून गावाची काळजी करतात. परंतु ब्रšादेवदादा माने यांची नाळ कुमठ्याशी अखेरपर्यंत जोडलेली राहिली. त्यांच्यामुळे गावाला नवी ओळख मिळाली.
साधा, सरळमार्गी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणारा नेता अशी ब्रšादेवदादांची जिल्‘ाला ओळख होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणात दादा अधिक रमले. शेती त्यांचा जीव की प्राण. सूर्योदयापूर्वी शेतात जाऊन कामाचे नियोजन करायचे. सकाळपासून कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी शेतात रीघ लागायची. आधी काम करा आणि मग राजकारण करा, तरच येणारा काळ तुमचा राहील, असा सल्ला ते देत असत. त्यामुळेच निरुद्योगी माणसे दादांच्या जवळ जायला कचरत असत. यशवंत बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे केले. गरजूंना मदतीचा हात दिला. पैशांअभावी शिक्षण खंडित केलेल्या तरुणांना त्यांनी बँकेकडून कर्ज दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली. जात पाहून नव्हे तर गरज पाहून बँकेत, शिक्षण संस्थेत ते सामावून घेत असत. त्यांचा कनवाळूपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. परंतु त्यांनी कधी कशाची फिकीर केली नाही. राजकारणात राहून समाजहित साधणारा हा ग्रामीण नेता होता.