शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विधायक कार्याचा वसा घेतलेला नेता : ब्रšादेवदादा माने लोकनेते स्व. ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (सोमवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 22:55 IST

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.
जात व धर्माच्या जाणिवा असलेल्या संघटना ब्रšादेवदादा माने यांना राजकारणात मान्य नव्हत्या. कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याच्यात देवपण शोधणार्‍यांपैकी दादा नव्हते. परिश्रमपूर्वक जनसेवा व जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यकर्ता सचोटीला उतरला तरच समाजाने त्याची कदर केली पाहिजे, असा दादांचा आग्रह असायचा. तोच आग्रह राजकारण निरोगी करण्याला उपयोगी पडतो. ब्रšादेवदादा माने यांचे नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व स्वत:च्या पायावर उभे राहून साध्य झालेले आहे. कोणाच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही की, राजकारणातली त्यांची एंट्री अपघात नाही. समाजाच्या सेवेतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. राजकारणात स्थिरावले आणि विचाराने ते नेतृत्व बहरत राहिले.
एखाद्या नेत्याची कार्यपद्धती व विचारसरणी जनहिताच्या विरोधी असेल तर त्याविरोधी दादा उघडपणे भूमिका घेत असत. क˜र काँग्रेसवादी असूनही दादांनी अनेकदा काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. १९७१ साली लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. निवडणूक प्रचाराची टिळक चौकात मोठी सभा झाली. या सभेत दादांनी रंगाअण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्या निवडणुकीत त्यांनी अपार कष्ट घेतले. नवखे असूनही ग्रामीण भागात झंझावाती दौरे करीत काँग्रेसच्या विरोधात रान उठवले. त्यांचा पिंड मुळात काँग्रेसचा. तरीही अन्याय झाला की, पक्षाच्या विरोधात ते पेटून उठत असत. १९६७ साली दादांचे नातलग राजाराम ढवळे यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ब्रšादेवदादांकडे आग्रह धरीत निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांचे बंड यशस्वी ठरले. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात अनेकदा अशा घटना त्यांच्याबाबत घडल्या.
राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने रचनात्मक काम उभे करावे, अशी अपेक्षा असते. अशा रचनात्मक कामाचा राजकीय लाभ जरी त्या व्यक्तीला होण्याची शक्यता असली तरी त्या कार्याचा तो हेतू असू नये. अशी विचारसरणी ब्रšादेवदादांची होती. त्यांनी स्वत:च्या गावी कुमठे येथे आपल्या रचनात्मक कामाचा डोंगर उभारला आहे. बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एका छताखाली देणारी शिक्षण संस्था दादांनी कुमठ्यात उभी केली आहे. अनेक नेते शहरात राहून गावाची काळजी करतात. परंतु ब्रšादेवदादा माने यांची नाळ कुमठ्याशी अखेरपर्यंत जोडलेली राहिली. त्यांच्यामुळे गावाला नवी ओळख मिळाली.
साधा, सरळमार्गी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणारा नेता अशी ब्रšादेवदादांची जिल्‘ाला ओळख होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणात दादा अधिक रमले. शेती त्यांचा जीव की प्राण. सूर्योदयापूर्वी शेतात जाऊन कामाचे नियोजन करायचे. सकाळपासून कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी शेतात रीघ लागायची. आधी काम करा आणि मग राजकारण करा, तरच येणारा काळ तुमचा राहील, असा सल्ला ते देत असत. त्यामुळेच निरुद्योगी माणसे दादांच्या जवळ जायला कचरत असत. यशवंत बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे केले. गरजूंना मदतीचा हात दिला. पैशांअभावी शिक्षण खंडित केलेल्या तरुणांना त्यांनी बँकेकडून कर्ज दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली. जात पाहून नव्हे तर गरज पाहून बँकेत, शिक्षण संस्थेत ते सामावून घेत असत. त्यांचा कनवाळूपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. परंतु त्यांनी कधी कशाची फिकीर केली नाही. राजकारणात राहून समाजहित साधणारा हा ग्रामीण नेता होता.