शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

विधायक कार्याचा वसा घेतलेला नेता : ब्रšादेवदादा माने लोकनेते स्व. ब्रšादेवदादा माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (सोमवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 22:55 IST

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.

राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रšादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महात्मा फुल्यांच्या विचारांशी मिळतेजुळते होते.
जात व धर्माच्या जाणिवा असलेल्या संघटना ब्रšादेवदादा माने यांना राजकारणात मान्य नव्हत्या. कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याच्यात देवपण शोधणार्‍यांपैकी दादा नव्हते. परिश्रमपूर्वक जनसेवा व जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यकर्ता सचोटीला उतरला तरच समाजाने त्याची कदर केली पाहिजे, असा दादांचा आग्रह असायचा. तोच आग्रह राजकारण निरोगी करण्याला उपयोगी पडतो. ब्रšादेवदादा माने यांचे नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व स्वत:च्या पायावर उभे राहून साध्य झालेले आहे. कोणाच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला नाही की, राजकारणातली त्यांची एंट्री अपघात नाही. समाजाच्या सेवेतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. राजकारणात स्थिरावले आणि विचाराने ते नेतृत्व बहरत राहिले.
एखाद्या नेत्याची कार्यपद्धती व विचारसरणी जनहिताच्या विरोधी असेल तर त्याविरोधी दादा उघडपणे भूमिका घेत असत. क˜र काँग्रेसवादी असूनही दादांनी अनेकदा काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. १९७१ साली लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. निवडणूक प्रचाराची टिळक चौकात मोठी सभा झाली. या सभेत दादांनी रंगाअण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्या निवडणुकीत त्यांनी अपार कष्ट घेतले. नवखे असूनही ग्रामीण भागात झंझावाती दौरे करीत काँग्रेसच्या विरोधात रान उठवले. त्यांचा पिंड मुळात काँग्रेसचा. तरीही अन्याय झाला की, पक्षाच्या विरोधात ते पेटून उठत असत. १९६७ साली दादांचे नातलग राजाराम ढवळे यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ब्रšादेवदादांकडे आग्रह धरीत निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांचे बंड यशस्वी ठरले. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काळात अनेकदा अशा घटना त्यांच्याबाबत घडल्या.
राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने रचनात्मक काम उभे करावे, अशी अपेक्षा असते. अशा रचनात्मक कामाचा राजकीय लाभ जरी त्या व्यक्तीला होण्याची शक्यता असली तरी त्या कार्याचा तो हेतू असू नये. अशी विचारसरणी ब्रšादेवदादांची होती. त्यांनी स्वत:च्या गावी कुमठे येथे आपल्या रचनात्मक कामाचा डोंगर उभारला आहे. बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एका छताखाली देणारी शिक्षण संस्था दादांनी कुमठ्यात उभी केली आहे. अनेक नेते शहरात राहून गावाची काळजी करतात. परंतु ब्रšादेवदादा माने यांची नाळ कुमठ्याशी अखेरपर्यंत जोडलेली राहिली. त्यांच्यामुळे गावाला नवी ओळख मिळाली.
साधा, सरळमार्गी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणारा नेता अशी ब्रšादेवदादांची जिल्‘ाला ओळख होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणात दादा अधिक रमले. शेती त्यांचा जीव की प्राण. सूर्योदयापूर्वी शेतात जाऊन कामाचे नियोजन करायचे. सकाळपासून कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी शेतात रीघ लागायची. आधी काम करा आणि मग राजकारण करा, तरच येणारा काळ तुमचा राहील, असा सल्ला ते देत असत. त्यामुळेच निरुद्योगी माणसे दादांच्या जवळ जायला कचरत असत. यशवंत बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे केले. गरजूंना मदतीचा हात दिला. पैशांअभावी शिक्षण खंडित केलेल्या तरुणांना त्यांनी बँकेकडून कर्ज दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली. जात पाहून नव्हे तर गरज पाहून बँकेत, शिक्षण संस्थेत ते सामावून घेत असत. त्यांचा कनवाळूपणा कधी कधी अडचणीचा ठरायचा. परंतु त्यांनी कधी कशाची फिकीर केली नाही. राजकारणात राहून समाजहित साधणारा हा ग्रामीण नेता होता.