शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पंतप्रधानांकडून ५ राज्यांत ‘विकसित भारत’चा प्रारंभ; ‘मोदी की गॅरंटीवाली गाडी’ करणार वंचितांची नोंदणी, तक्रारकर्त्यांना मिळते त्वरित मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 07:43 IST

योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेकडे वळले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांमध्ये यात्रेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांशी संवाद साधला. 

योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे. पंतप्रधानांनी या बसेसला-मोदी की गॅरंटीवाली गाडी-असे म्हटले आहे. 

या बसेसमध्ये (रथ) डिजिटल उपकरणे बसविलेली आहेत. ज्यांची तक्रार असेल त्यांना त्वरित मदत मिळते. केंद्राचे वरिष्ठ अधिकरी आणि इतर या रथाचा महत्त्वाचा भाग आहेत.एका महिन्याच्या कालावधीत ही यात्रा ६८,२६७ ग्रामपंचायतींमधील २.५४ कोटी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तेथे केंद्र सरकारच्या योजनांच्या २ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी-मेरी कहानी, मेरी जुबानी-या उपक्रमांतर्गत अनुभव कथन केलेले आहेत.

बसेसची संख्या वाढणार २५ जानेवारी २०२४पर्यंत देशभरातील ६.६४ लाख गावे आणि ४,००० पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पंतप्रधानांच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी १५०० बसेस आजवर कार्यरत होत्या.  आता ही संख्या १,७००वर गेली आहे आणि पुढील ७० दिवसांत ही संख्या २५००वर जाण्याची शक्यता आहे. विविध योजनांचा लाभ न मिळालेल्यांचीही नोंदणी यावेळी केली जाणार आहे.

५१ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी  आरोग्य शिबिरांमध्ये आजवर ५१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, १० लाख आयुष्मान भारत हेल्थ कार्ड जारी करण्यात आले आहेत.  सात लाखांपेक्षा अधिक लोकांनी समाजासाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे आणि माय भारत व्हॉलिंटिअर या योजनेंतर्गत नोंदणी केलेली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी