शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

लग्न उशिरा; तरीही लग्नानंतरच मुलींच्या जीवनमानात बदल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:09 IST

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो.

नवी दिल्ली :

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वूमेन अँड मेन इन इंडिया २०२२’ अहवालानुसार, महिलांचे लग्नाचे सरासरी वय वाढले आहे. हे वय २०१७ मध्ये २२.१ होते, ते वाढून २०२० मध्ये २२.७ झाले आहे. असे असूनही, महिलांची स्थिती अजूनही अनेक प्रकरणांमध्ये विवाहित जीवनावर अवलंबून असते. लग्नानंतर नोकरदार महिलांची संख्या कमी होऊ लागते.

 गाव आणि शहरात लग्नाच्या वयात फरक देशातील शहरी आणि ग्रामीण पातळीवर लग्नाच्या वेळी महिलांच्या सरासरी वयात अजूनही तफावत आहे. तीन वर्षांपूर्वी शहरांमध्ये २३.९ आणि गावांमध्ये २२.२ वर्षे वयात महिलांची लग्ने होत होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांचे विवाह करण्याचे वय सरासरी २६ वर्षे आहे. तर सर्वांत कमी वयात (२१ वर्षे) पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे मुलींचे लग्न केले जाते. २०२० मध्ये दिल्लीमध्ये लग्नाचे वय सरासरी २४.४ वर्षे, मध्य प्रदेशमध्ये २१.८ आणि छत्तीसगडमध्ये २१.६ वर्षे होते.

जबाबदारीचे ओझे...कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विवाहित महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग मर्यादित आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, देशातील १५-४९ वयोगटातील केवळ ३२% स्त्रिया लग्नानंतर घराबाहेर काम करतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९८ टक्के इतके आहे.

नोकरी नव्हे, लग्न हे स्थलांतराचे कारण१९८१ ते २०१७ पर्यंत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ४०.५ टक्क्यांनी वाढले आहे, तर पुरुषांच्या बाबतीत ही वाढ केवळ २८.३ % होती. असे असूनही, केवळ ०.६ % महिला शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जातात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ४.७% आहे. ‘भारतातील स्थलांतर २०२०-२१’ अहवालानुसार, केवळ ०.७% स्त्रिया नोकरी, चांगल्या संधी, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी जवळ असणे किंवा बदलीमुळे स्थलांतर करतात, तर ८६.८ टक्के महिला लग्नामुळे स्थलांतरित होतात.

 देशातील विवाहाच्या वेळी महिलांचे सरासरी वय