शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

लग्न उशिरा; तरीही लग्नानंतरच मुलींच्या जीवनमानात बदल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:09 IST

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो.

नवी दिल्ली :

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वूमेन अँड मेन इन इंडिया २०२२’ अहवालानुसार, महिलांचे लग्नाचे सरासरी वय वाढले आहे. हे वय २०१७ मध्ये २२.१ होते, ते वाढून २०२० मध्ये २२.७ झाले आहे. असे असूनही, महिलांची स्थिती अजूनही अनेक प्रकरणांमध्ये विवाहित जीवनावर अवलंबून असते. लग्नानंतर नोकरदार महिलांची संख्या कमी होऊ लागते.

 गाव आणि शहरात लग्नाच्या वयात फरक देशातील शहरी आणि ग्रामीण पातळीवर लग्नाच्या वेळी महिलांच्या सरासरी वयात अजूनही तफावत आहे. तीन वर्षांपूर्वी शहरांमध्ये २३.९ आणि गावांमध्ये २२.२ वर्षे वयात महिलांची लग्ने होत होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांचे विवाह करण्याचे वय सरासरी २६ वर्षे आहे. तर सर्वांत कमी वयात (२१ वर्षे) पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे मुलींचे लग्न केले जाते. २०२० मध्ये दिल्लीमध्ये लग्नाचे वय सरासरी २४.४ वर्षे, मध्य प्रदेशमध्ये २१.८ आणि छत्तीसगडमध्ये २१.६ वर्षे होते.

जबाबदारीचे ओझे...कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विवाहित महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग मर्यादित आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, देशातील १५-४९ वयोगटातील केवळ ३२% स्त्रिया लग्नानंतर घराबाहेर काम करतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९८ टक्के इतके आहे.

नोकरी नव्हे, लग्न हे स्थलांतराचे कारण१९८१ ते २०१७ पर्यंत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ४०.५ टक्क्यांनी वाढले आहे, तर पुरुषांच्या बाबतीत ही वाढ केवळ २८.३ % होती. असे असूनही, केवळ ०.६ % महिला शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जातात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ४.७% आहे. ‘भारतातील स्थलांतर २०२०-२१’ अहवालानुसार, केवळ ०.७% स्त्रिया नोकरी, चांगल्या संधी, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी जवळ असणे किंवा बदलीमुळे स्थलांतर करतात, तर ८६.८ टक्के महिला लग्नामुळे स्थलांतरित होतात.

 देशातील विवाहाच्या वेळी महिलांचे सरासरी वय