शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मागील ४६ वर्षात देशभरात १ हजार पटीने महिला अत्याचारात वाढ; धक्कादायक आकडेवारी उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 12:13 IST

देश स्वातंत्र्य झाल्यापासून महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.

नवी दिल्ली - देशभरात बलात्काराच्या घटनांची संपूर्ण देशाला हदरवून टाकलं आहे. हैदराबाद, उन्नाव, दिल्ली निर्भया प्रकरणानंतर लोकांनी आक्रोश व्यक्त केला. मात्र गेल्या ४६ वर्षात देशात बलात्काराच्या घटनांमध्ये १ हजार पटीने वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रिकोर्ड ब्युरोने ही माहिती दिली आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार १९७१ ते २०१७ या ४६ वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यात १, ३५३ पटीने वाढ झालेली आहे. या तुलनेत लोकसंख्या वाढीत २२० टक्के वाढ झालेली दिसते. हैदराबाद घटनेत पीडित तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. या चारही आरोपींचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. याबाबत लोकांकडून कौतुक होत असलं तरी अनेकांनी या प्रश्न उपस्थित केले आहेत. या एन्काऊंटरनंतर देशात न्यायव्यवस्थेवरुन वादंग निर्माण झालेत. 

एन्काऊंटर करणे चुकीचं आहे की बरोबर हे हैदराबाद पोलिसांना माहिती असेल. एन्काऊंटरनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत पोलिसांना जाण होती. प्रकरणाची चौकशी होणार याचीही माहिती होती. तरीही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला. देश स्वातंत्र्य झाल्यापासून महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. इतकचं नाही तर महिला अत्याचारातील आरोप असणारे अनेक जण संसदेत आणि विधानसभेत पोहचले. १९७१ मध्ये देशभरात २ हजार ४८७ बलात्काराचे गुन्हे नोंद होते. २०१७ मध्ये हा आकडा ३३ हजार ६५८ पर्यंत पोहचला. हे आकडे कागदोपत्री आहेत. याशिवाय अशी अनेक प्रकरणं दाबली गेली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एनसीआरबी गुन्ह्याचे रेकॉर्ड १९५३ पासून ठेवत आहे. १९७१ मध्ये महिलांवर अत्याचाराचे गुन्हे रेकॉर्ड होऊ लागले. १९७१ ते २०१३ पर्यंत महिलांवरील अत्याचाराची नोंद एनसीआरबीकडे ठेवली जात होती. मात्र २०१४ पासून याची तुलनात्मक आकडेवारी समोर आली नाही. 

१९९० पासून महिला आपल्या अधिकारांसाठी पुढे येऊ लागल्या. महिलांवरील अत्याचारात कमी होताना दिसत नाही. एनसीआरबीने दिलेल्या आकडेवारीमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा आणखी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. २००६ मध्ये महिलांवरील अत्याचारात १९७१ च्या तुलनेत ७७७ टक्के वाढ झाली होती. १९७१ मध्ये ही संख्या २ हजार ७८४ होती तर २००६ मध्ये १९ हजार ३४८ महिला अत्याचारांच्या गुन्ह्याची नोंद होती. एनसीआरबी अहवालानुसार २०१४ मध्ये ३६ हजार ९६८ महिलांवरील अत्याचारांची नोंद आहे. तसेच २०१७ च्या आकडेवारीनुसार देशातील १ हजार ३७१ जेलमधील ५० हजार ६६९ आरोपींवर महिला अत्याचार गुन्ह्याची नोंद आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाPrisonतुरुंगCrime Newsगुन्हेगारीhyderabad caseहैदराबाद प्रकरण