शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

'तो' 20 वर्षांपासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतो... आभार मानतो! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:22 IST

'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली.'

दहशतवादी हल्ल्यात भारताचा जवान शहीद झाल्याची बातमी आपल्या मनाला चटका लावून जाते. देशाचं संरक्षण करताना, म्हणजेच आपलं - आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी या वीरानं हौतात्म्य पत्करलंय, याची जाणीव आपल्याला असते. पण, या जवानांना मनातल्या मनात श्रद्धांजली वाहून आपण आपल्या कामात गढून जातो. काही दिवसांनी त्यांना विसरूनही जातो. मात्र, आपल्यातलाच एक जण गेली २० वर्षं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतोय. देशाच्या रक्षणासाठी आपला जीवलग - नातलग गमावणाऱ्या परिवाराचे तो आभार मानतोय, जवानाच्या हौतात्म्याला वंदन करतोय. हे आगळं व्रत अंगिकारलेल्या व्यक्तीचं नाव आहे, जीतेंद्र कुमार गुज्जर. 

'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली. त्यानंतर, गेल्या २० वर्षांत जवळपास ४ हजार पत्रं मी पाठवली आहेत. त्यातल्या अनेक पत्रांना शहिदांच्या कुटुंबीयांनी उत्तरंही पाठवली. या कुटुंबीयांशी माझं वेगळं नातं निर्माण झालंय, काही जण तर मला मुलगाच मानतात. त्यांचं हे प्रेम पाहून मी सद्गदित होतो', अशा भावना जीतेंद्र कुमार गुज्जर यांनी व्यक्त केल्या. 

जीतेंद्र कुमार हे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी. ते एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतात. वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांवर जवान शहीद झाल्याची बातमी पाहिल्यानंतर ते त्या जवानाच्या कुटुंबाची माहिती मिळवतात आणि पत्र पाठवून त्यांना धीर देतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पोस्टकार्डावर देशाचा तिरंगा काढून शेजारी 'सत्यमेव जयते' असं लिहून जीतेंद्र कुमार कुटुंबीयांच्या त्यागाला, त्यांच्या धाडसाला सलाम करतात. 

शहीद जवानांच्या विविध नोंदी ठेवण्यासाठी जीतेंद्र यांनी एक रजिस्टरच तयार केलं आहे. ते आजपर्यंत सुमारे ५० शहीद कुटुंबीयांच्या घरी जाऊन आलेत. त्यांच्याकडून त्यांच्या घरची मातीही त्यांनी आणलीय. या मातीचा वापर करून एक शहीद स्मारक उभं करण्याचा त्यांचा मानस आहे. जीतेंद्र कुमार हे कार्य अनोख्या देशप्रेमाचं, देशभक्तीचंच द्योतक आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान