शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

'तो' 20 वर्षांपासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतो... आभार मानतो! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:22 IST

'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली.'

दहशतवादी हल्ल्यात भारताचा जवान शहीद झाल्याची बातमी आपल्या मनाला चटका लावून जाते. देशाचं संरक्षण करताना, म्हणजेच आपलं - आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी या वीरानं हौतात्म्य पत्करलंय, याची जाणीव आपल्याला असते. पण, या जवानांना मनातल्या मनात श्रद्धांजली वाहून आपण आपल्या कामात गढून जातो. काही दिवसांनी त्यांना विसरूनही जातो. मात्र, आपल्यातलाच एक जण गेली २० वर्षं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पत्र पाठवतोय. देशाच्या रक्षणासाठी आपला जीवलग - नातलग गमावणाऱ्या परिवाराचे तो आभार मानतोय, जवानाच्या हौतात्म्याला वंदन करतोय. हे आगळं व्रत अंगिकारलेल्या व्यक्तीचं नाव आहे, जीतेंद्र कुमार गुज्जर. 

'आमच्या गावातील अनेक जण १९९९च्या कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी, सलाम करण्यासाठी मी पहिल्यांदा पत्रं लिहिली. त्यानंतर, गेल्या २० वर्षांत जवळपास ४ हजार पत्रं मी पाठवली आहेत. त्यातल्या अनेक पत्रांना शहिदांच्या कुटुंबीयांनी उत्तरंही पाठवली. या कुटुंबीयांशी माझं वेगळं नातं निर्माण झालंय, काही जण तर मला मुलगाच मानतात. त्यांचं हे प्रेम पाहून मी सद्गदित होतो', अशा भावना जीतेंद्र कुमार गुज्जर यांनी व्यक्त केल्या. 

जीतेंद्र कुमार हे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी. ते एका खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतात. वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांवर जवान शहीद झाल्याची बातमी पाहिल्यानंतर ते त्या जवानाच्या कुटुंबाची माहिती मिळवतात आणि पत्र पाठवून त्यांना धीर देतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पोस्टकार्डावर देशाचा तिरंगा काढून शेजारी 'सत्यमेव जयते' असं लिहून जीतेंद्र कुमार कुटुंबीयांच्या त्यागाला, त्यांच्या धाडसाला सलाम करतात. 

शहीद जवानांच्या विविध नोंदी ठेवण्यासाठी जीतेंद्र यांनी एक रजिस्टरच तयार केलं आहे. ते आजपर्यंत सुमारे ५० शहीद कुटुंबीयांच्या घरी जाऊन आलेत. त्यांच्याकडून त्यांच्या घरची मातीही त्यांनी आणलीय. या मातीचा वापर करून एक शहीद स्मारक उभं करण्याचा त्यांचा मानस आहे. जीतेंद्र कुमार हे कार्य अनोख्या देशप्रेमाचं, देशभक्तीचंच द्योतक आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान