शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:24 IST

Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला आहे. ...

Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात असलं तरी दोन पर्यटकांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर १० पर्यटक आणि २ स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 

मंगळवारी साडेतीनच्या सुमारास अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. हा हल्ला बैसरन या गवताळ प्रदेशाजवळ झाला. दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची संलग्न संघटना आहे. पाकिस्तानमधील शेख सज्जाद गुल हा टीआरएफचे प्रमुख आहे.

दोन ते तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होती. पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. हल्ल्यानंतर गोंधळ उडताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टीआरएफ ही दहशतवादी संघटना २०१९ मध्ये सुरु आली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवताच ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली. पण थोड्याच वेळात या दहशतवादी संघटनेने डझनभर दहशतवादी हल्ले केले. २०२३ मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत टीआरएफ दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. टीआरएफची निर्मिती पाकिस्तानपासून सुरू होते.   पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबा यांनी मिळून 'द रेझिस्टन्स फ्रंट' या नवीन दहशतवादी संघटनेचा पाया रचला होता.

जम्मू आणि काश्मीरमध्ये टीआरएफ केलेल्या प्रत्येक हल्ल्यानंतर एक पत्र जारी करते. त्यानुसार पहलगाम हल्ल्यातही दहशतवादी संघटनेने असेच एक पत्र जारी केले आहे. "जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना डोमिसाईल जारी केला जात आहे. हा प्रयत्न जम्मू आणि काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा आहे. स्थानिक नसलेले लोक तिथे येतात आणि स्वतःची पर्यटक म्हणून ओळख सांगतात आणि डोमिसाईल मिळवतात. त्यानंतर तिथे जमीन ताब्यात घेण्याचा खेळ सुरू होतो," असे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र टीआरएफकडून या पत्राची अधिकृत घोषणा झालेली नाही.

"जम्मू आणि काश्मीरमध्ये ८५ हजारांहून अधिक डोमिसाईल जारी करण्यात आले आहेत. हे डोमिसाईल स्थानिक लोकांना नाही तर बाहेरील लोकांना देण्यात आले आहे. याद्वारे जम्मू-काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे दहशतवादी हल्ले जम्मू आणि काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे लोकांना वसवण्याच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत," असे टीआरएफने म्हटलं आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला